तळकोकणातील आंबा बागायतदार आंब्याच पीक कमी आल्याने चिंतेत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन मंत्री नितेश राणे यांनी बागांची पाहणी केली. आंबा बागायतदारांची परिस्थिती अतिशय गंभीर असून शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलेय.
तळकोकणातील आंबा बागायतदार आंब्याच पीक कमी आल्याने चिंतेत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन मंत्री नितेश राणे यांनी बागांची पाहणी केली. आंबा बागायतदारांची परिस्थिती अतिशय गंभीर असून शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलेय.