शहरात अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर उघडया स्थितीत आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असून ट्रान्सफार्मर सुरक्षित करण्यात यावेत, अशी सूचना संकेत नाईक यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासनाची पूर्तता होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यामध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर आजच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भाजपाचे बांधा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आले.
बागायतदार शेतकरी रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही. सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
तळकोकणातील आंबा बागायतदार आंब्याच पीक कमी आल्याने चिंतेत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून २२ वर्षीय आर्यन रवंदेने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा ९० टक्के आंबा काजू पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
वाहतुकीचा ताण रस्ता खराब असल्यामुळे प्रवासी आता गगनबावडा (करूळ घाट) किंवा आंबोली मार्गाचा अवलंब करत आहेत. परिणामी करूळ घाटावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे.
या अपघाताचे वृत्त समजताच खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करून जखमी व मृतदेह बाहेर काढला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीकच्या वेताळ बांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.
कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा आजपासून प्रत्यक्षात सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजता मंत्री Nitesh Rane यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रवासी जहाजाला रवाना करण्यात…
भरती प्रक्रिया जाहीर करताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच ठिकाणी जाहीर केली होती. परंतु लिपिक पदाच्या या भरतीसाठी जिल्हाभरातून ५०७७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात ३४ हजार ८५१ ग्राहकांकडे ०६ कोटी १२ लाख, कुडाळ विभागात ३८ हजार १०८ ग्राहकांकडे ०७ कोटी ०४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
क्षणभरासाठी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. रुग्ण नसल्याने मोठी जीवितहानी टळली; परंतु हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
२०२६-२७ध्या कॅपिटल बजेटमध्ये तरतूद करून सावंतवाडीला पूर्ण क्षमतेचे टर्मिनस बनवावे , अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केली.