Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक खळबळ; संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांचा एस. जयशंकर यांना फोन

Pahalgam Terror Attack: संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी याबाबत भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 30, 2025 | 02:16 PM
Global outcry after Pahalgam attack UN chief calls Jaishankar Pakistan worried

Global outcry after Pahalgam attack UN chief calls Jaishankar Pakistan worried

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam terror attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी थेट भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत शांतता व स्थैर्य टिकवण्याचे आवाहन केले आहे.

गुटेरेस यांचा भारताशी थेट संवाद, हल्ल्याचा निषेध

पहलगाम येथील या हल्ल्यात नागरिकांचे आणि जवानांचे प्राण गेले असून, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांनी एस. जयशंकर यांना फोन करून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “दहशतवादाला कोणतीही जागा नाही. अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.”

या फोनबाबत एस. जयशंकर यांनी स्वतः इन्स्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली. त्यांनी लिहिले, “संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचा फोन आला. त्यांनी पहलगाममधील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. त्यांच्या भावना आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताकडून हल्ल्याची भीती; पाकिस्तानची लष्करी हालचाल वाढली, हवाई दल सतर्क, सीमा सुरक्षा बळकट

पाकिस्तानमध्ये युद्धाची भीती, गुटेरेस यांच्याशी संपर्क

दरम्यान, पाकिस्तानमध्ये या घटनेनंतर युद्धाची भीती वाढली आहे. देशातील अनेक वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की भारताकडून लवकरच कठोर प्रत्युत्तर मिळू शकते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गुटेरेस यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. शाहबाज म्हणाले, “भारताकडून पाकिस्तानवर लावले जाणारे आरोप निराधार आहेत. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत. महासचिव गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.” पाकिस्तानने या विषयावर रशिया, तुर्की यांच्यासह इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार आणि लष्कर देखील सतर्क अवस्थेत आहेत.

संयुक्त राष्ट्रांचा संतुलित दृष्टिकोन, तणाव नको, जबाबदारी हवी

गुटेरेस यांनी दोन्ही देशांना स्पष्टपणे संदेश दिला आहे की, अशा प्रकारच्या घटनांचा आंतरराष्ट्रीय चौकशीतून निकाल लागावा, आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई व्हावी. त्यांच्या मते, अशा घटकांमुळे दक्षिण आशियात तणाव वाढू शकतो, जो केवळ भारत आणि पाकिस्तानसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी धोका ठरू शकतो. त्यांनी हेही स्पष्ट केले की, कुठल्याही प्रकारचा युद्धजन्य निर्णय टाळावा आणि शांततेच्या दिशेने पावले उचलावीत.

भारत ठाम, पाकिस्तान बचावात्मक

भारताने आधीच या हल्ल्याबाबत पाकिस्तानला दोषी धरले असून, पाक पुरस्कृत दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे. भारताची भूमिका ठाम आहे की, दहशतवाद आणि शांततेचा एकत्र अस्तित्व असू शकत नाही. पाकिस्तान मात्र बचावात्मक भूमिकेत असून, तो सर्व आरोप फेटाळत आहे. परंतु, गुटेरेस यांचा या मुद्द्यावर हस्तक्षेप आणि दोन्ही देशांशी संपर्क साधणे, हे दर्शवते की जागतिक समुदाय या घटनेला गंभीरतेने घेत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताकडून हल्ल्याची भीती; पाकिस्तानची लष्करी हालचाल वाढली, हवाई दल सतर्क, सीमा सुरक्षा बळकट

 आंतरराष्ट्रीय दबाव वाढणार, दहशतवादाविरोधात भूमिका ठोस होणार

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढताना दिसत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांच्या मध्यस्थीमुळे कूटनीतिक संवादाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युद्ध नको, जबाबदारी हवी – असा संतुलित संदेश गुटेरेस यांनी दोन्ही देशांना दिला असून, या प्रकरणाची न्याय्य चौकशी आणि दहशतवादाविरुद्ध संयुक्त कारवाई हीच जागतिक अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Global outcry after pahalgam attack un chief calls jaishankar pakistan worried

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • S. Jayshankar
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया
1

‘Asim Munir चा नवा ‘Bleed India’ प्लॅन? पाकमध्ये लष्करी सत्ता केंद्रीकृत; भारतावर पुन्हा कारगिलसारख्या छुप्या युद्धाची छाया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.