Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास कोणता देश कोणाच्या बाजूने असेल?

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या भयानक हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2025 | 10:30 PM
If there is an India-Pakistan war which country will be on whose side

If there is an India-Pakistan war which country will be on whose side

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या भयानक हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला आहे. या अमानुष घटनेनंतर भारतात संतापाची लाट उसळली असून, केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यात येत असून, पाकिस्तानी दूतावास आणि सिंधू पाणी करार रद्द करण्यासह पाकिस्तानच्या नागरिकांना भारतात प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो – जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली, तर कोणते देश कोणाच्या बाजूने उभे राहतील?

दुहेरी आघाडीचा धोका, चीनचा संभाव्य सहभाग

पाकिस्तानला सतत पाठिंबा देणारा आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश म्हणजे चीन. इतिहास पाहता, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात चीनने थेट हस्तक्षेप केला नाही, परंतु सध्याच्या बदललेल्या आंतरराष्ट्रीय समीकरणात चीनचा दृष्टिकोनही अधिक आक्रमक झाला आहे. भारताने अलीकडच्या काळात आपली लष्करी आणि आर्थिक ताकद प्रचंड वाढवली आहे. त्यामुळे चीन युद्धात उडी घेण्याचा निर्णय अगदी सहज घेणार नाही. तरीही, जर चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला, तर भारतासाठी एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढावे लागणे हे अत्यंत कठीण आव्हान असेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका; पाकिस्तान सतर्क, अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांचा सराव सुरू

भारताला कोणकोणाचा पाठिंबा मिळू शकतो?

आजचा भारत हा केवळ आशियातील नव्हे, तर जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचा आणि विश्वासार्ह देश बनला आहे.

१. अमेरिका:

अमेरिकेचा भारताशी विविध क्षेत्रात मजबूत संबंध आहे. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तानबाबत अमेरिका पूर्वी जरी संमिश्र धोरण ठेवत होती, तरी ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानातील उपस्थितीमुळे अमेरिकेचा विश्वास कमी झाला आहे.

२. रशिया:

भारत आणि रशियाचे दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शस्त्रास्त्र खरेदीपासून ते राजनैतिक सहकार्यापर्यंत भारत-रशिया संबंध नेहमी मजबूत राहिले आहेत. १९७१ च्या युद्धात रशियाने भारताला खुला पाठिंबा दिला होता.

३. इस्रायल:

कारगिल युद्धकाळात इस्रायलने भारताला अत्यंत महत्त्वपूर्ण तांत्रिक सहाय्य दिले होते. नाईट व्हिजन तंत्रज्ञान, ड्रोन आणि लक्षवेधी क्षेपणास्त्रांसह अनेक अत्याधुनिक साधनांचा पुरवठा इस्रायलकडून करण्यात आला होता. सध्याही इस्रायल-भारत संबंध दृढ आहेत.

पाकिस्तानकडून संभाव्य मदतीची शक्यता

पाकिस्तानकडे चीनशिवाय फारसे पर्याय नाहीत. मुस्लिम देशांकडून मदत मिळण्याची शक्यता देखील फारशी नाही. मधल्या पूर्वेतील बऱ्याच इस्लामिक देशांनी भारताशी चांगले आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहेत. युद्धात थेट पाकिस्तानच्या बाजूने उभे राहण्याची त्यांची शक्यता कमी आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 90 च्या दशकात काश्मीरमध्ये होते ‘या’ दहशतवादी संघटनेचे वर्चस्व; दररोज होत असत चकमकी

शेवटी काय?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असला, तरी भारताच्या बाजूने उभे राहणाऱ्या देशांची संख्या आणि ताकद निश्चितच जास्त आहे. जर युद्ध झाले, तर पाकिस्तानला चीनच्या पाठिंब्याशिवाय दुसरा आधार मिळणे कठीण आहे. आणि जर चीननेही युद्धात तटस्थ भूमिका घेतली, तर पाकिस्तानला गंभीर नुकसान सहन करावे लागेल. अशा परिस्थितीत, भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांचे परिणाम भविष्यात स्पष्ट होतील. परंतु एक गोष्ट निश्चित आजचा भारत दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना कोणतीही माफी देणार नाही.

Web Title: If there is an india pakistan war which country will be on whose side

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 10:30 PM

Topics:  

  • india
  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
3

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
4

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.