Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?

India UN Ukraine remarks : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा अंत करण्यासाठी आणि कायमस्वरूपी शांततेच्या शक्यतांसाठी हे सर्व राजनैतिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत असे आम्हाला वाटते, असे भारताने UN मध्ये म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 05, 2025 | 12:50 PM
india un remarks russia ukraine global challenges peace efforts

india un remarks russia ukraine global challenges peace efforts

Follow Us
Close
Follow Us:

collateral consequences Ukraine conflict : रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या संघर्षात हजारो निष्पाप जीव गमावले गेले, लाखो लोक विस्थापित झाले आणि संपूर्ण जगावर त्याचे पडसाद उमटले. “युद्धभूमीवर कोणताही उपाय सापडत नाही, निष्पापांचे प्राण जाणे अस्वीकार्य आहे”, अशा ठाम शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आपली भूमिका मांडली. गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) झालेल्या महासभेच्या चर्चेत भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर भाष्य केले. ‘युक्रेनच्या व्यापलेल्या प्रदेशातील परिस्थिती’ या अजेंड्यावर झालेल्या चर्चेत भारताने स्पष्ट केले की, संघर्षाचा परिणाम फक्त युरोपवर नाही, तर संपूर्ण जगावर होत आहे विशेषतः ग्लोबल साउथमधील देशांवर, जे आधीच आर्थिक अडचणीत आहेत.

इंधन किमती आणि अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम

हरीश यांनी महासभेत सांगितले, “या युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, अन्नधान्य पुरवठा खंडित झाला आहे. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्या चिंता ऐकल्या गेल्या पाहिजेत आणि योग्य मार्गाने सोडवल्या पाहिजेत.” ग्लोबल साउथ म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागे असलेले किंवा विकसनशील देश. आज हेच देश युद्धामुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. भारताने त्यांचा आवाज जगासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रांतून केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेला आर्थिक झटका? भारत-चीन डॉलरविरोधी मोर्चावर; लवकरच येऊ शकते नवीन पेमेंट सिस्टम

भारताचा ठाम विश्वास : राजनैतिक उपायच पर्याय

भारताने पुन्हा एकदा अधोरेखित केले की युक्रेन युद्धाचा अंत केवळ राजनैतिक प्रयत्नांतूनच शक्य आहे. हरीश म्हणाले, “आम्हाला वाटते की शाश्वत शांततेसाठी सर्व भागधारकांचा सहभाग आवश्यक आहे. युद्धाचा काळ नाही, संवादाचाच काळ आहे.” भारताने गेल्या महिन्यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये झालेल्या शिखर परिषदेचे स्वागत केले. त्यात झालेल्या चर्चेचे कौतुक करत भारताने सांगितले की अशा संवादांमधूनच भविष्यकाळात शाश्वत शांततेची दिशा ठरू शकते.

मोदींची सक्रिय भूमिका

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या संघर्षावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. ते पुतिन, झेलेन्स्की तसेच युरोपियन नेतृत्वाशी सतत संवाद साधत आहेत. अलीकडेच त्यांनी युरोपियन युनियनचे वरिष्ठ नेते अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी संवाद साधला. सोशल मीडिया X वरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले की, “परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाली तसेच युक्रेन संघर्ष लवकर संपवण्याबाबतही विचारविनिमय झाला.” मोदी यांचे नेहमीचे स्पष्ट मत आहे “हा युद्धाचा काळ नाही.” त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हीच भूमिका ठामपणे मांडली आहे.

जयशंकर-सिबिहा संवाद

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी देखील युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय सहकार्य आणि युक्रेन संघर्षावर विचारविनिमय झाला. जयशंकर म्हणाले, “भारत या संघर्षाचा लवकर अंत व्हावा आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.” सिबिहा यांनीही जयशंकर यांना युद्धाची सध्याची परिस्थिती आणि “न्याय्य शांततेसाठी” युक्रेनच्या प्रयत्नांची माहिती दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इंडो-पॅसिफिकमध्ये नवा गेमचेंजर! 2030 पर्यंत भारत-जपान भागीदारीतून तयार होणार ‘हे’ प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र

भारताचा संदेश जगाला

महासभेत भारताने दिलेला संदेश अत्यंत मानवीय आणि संतुलित होता. युद्धामुळे गेलेले निष्पापांचे जीव, वाढलेली इंधन-अन्न संकटे आणि विस्थापित झालेल्या लाखो कुटुंबांचा संदर्भ देत भारताने पुन्हा सांगितले “शांततेसाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे. युद्धाने कधीही समस्यांचे निराकरण होत नाही.”

Web Title: India un remarks russia ukraine global challenges peace efforts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Effect Of Russia Ukraine War
  • india
  • International Political news

संबंधित बातम्या

India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर
1

India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर

Surat Fire Incident : सुरतच्या राज टेक्सटाईल मार्केटमध्ये भीषण आग, आठव्या मजल्यापर्यंतच्या अनेक दुकानं जळून खाक
2

Surat Fire Incident : सुरतच्या राज टेक्सटाईल मार्केटमध्ये भीषण आग, आठव्या मजल्यापर्यंतच्या अनेक दुकानं जळून खाक

Power Export : Modi सरकारचा निर्णय महत्त्वाचा! Nepalचा Bangladeshसोबत ‘वीज डिप्लोमसी’चा मोठा डाव; भारताचे सहकार्य अनिवार्य
3

Power Export : Modi सरकारचा निर्णय महत्त्वाचा! Nepalचा Bangladeshसोबत ‘वीज डिप्लोमसी’चा मोठा डाव; भारताचे सहकार्य अनिवार्य

Indigo Flight Crisis: ‘इंडिगोची सेवा पुन्हा पूर्ववत, १,८०० हून अधिक विमान उड्डाण…”, सीईओ पीटर एल्ब यांचा दावा
4

Indigo Flight Crisis: ‘इंडिगोची सेवा पुन्हा पूर्ववत, १,८०० हून अधिक विमान उड्डाण…”, सीईओ पीटर एल्ब यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.