Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने केला पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त’, माजी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा खुलासा

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तर म्हणून भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर केला. हा दावा पाकिस्तानच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याने केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 16, 2025 | 09:24 AM
India's BrahMos missile destroyed Pakistani air base reveals former Pakistani military officer

India's BrahMos missile destroyed Pakistani air base reveals former Pakistani military officer

Follow Us
Close
Follow Us:

BrahMos missile attack Pakistan : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईने शेजारील देशात खळबळ उडवली असून, पाकिस्तानच्या माजी एअर मार्शलने केलेल्या धक्कादायक खुलासामुळे प्रकरणात नव्या उलथापालथी सुरू झाल्या आहेत. माजी पाकिस्तानी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर थेट हल्ला केला आणि तळ उद्ध्वस्त केला.

पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर : भारताची ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिम

भारताच्या जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने अत्यंत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानने या कारवाईनंतर भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सेनेच्या तत्काळ आणि जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले. याच संदर्भात माजी पाकिस्तानी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिमाचलमध्ये सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा ‘खजिना’; पृथ्वीवरील जीवनाच्या उगमाचा दुवा उजेडात

भोलारी एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला

मसूद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, १० मे रोजी सकाळी भारताने जमिनीवरून चार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली. त्यांनी स्पष्ट केलं की, ही क्षेपणास्त्रे जमिनीवरून जमिनीवर होती की हवेतून जमिनीवर – याबाबत निश्चित माहिती नाही, मात्र ती थेट भोलारी एअरबेसवर आदळली.

या हल्ल्यात पाकिस्तानच्या अत्यंत महत्त्वाच्या AWACS विमानाला मोठे नुकसान झाले. हँगरवर थेट हल्ला झाल्याने काही अधिकारीही मृत्युमुखी पडले, असे त्यांनी कबूल केले. हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी वैमानिक विमानांना सुरक्षित स्थळी हलवू लागले, पण तोपर्यंत नुकसान होऊन गेले होते.

भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापुढे पाकिस्तानचे संरक्षण अपयशी

अख्तर यांच्या मते, भारताने वापरलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत अचूक आणि वेगवान आहे. पाकिस्तानने हे क्षेपणास्त्र रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्यांची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णतः निष्क्रिय ठरली.

“आमच्या संरक्षण व्यवस्थेने एकही क्षेपणास्त्र रोखू शकले नाही. हल्ला इतका वेगवान होता की, कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही,” असे मसूद अख्तर म्हणाले.

पाकिस्तानची धास्ती वाढली, लष्कर गोंधळले

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या लष्करात आणि प्रशासनात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भारताची ही कारवाई केवळ दहशतवादी अड्ड्यांपुरती मर्यादित न राहता थेट लष्करी ठिकाणांवर झाल्याने, पाकिस्तान हादरून गेला. पाक लष्करानेही भारताच्या विविध शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला. भारताच्या सर्जिकल कारवायांनी आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचे वृत्त आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताची ‘Zero tariff trade deal’ ऑफर; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा, भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरही मतप्रदर्शन

भारताची धडाडी आणि संदेश

भारताने ब्रह्मोससारख्या अचूक आणि धोकादायक क्षेपणास्त्रांचा वापर करत, केवळ प्रतिशोध घेतला नाही, तर दहशतवादाला मदत करणाऱ्या यंत्रणांना थेट इशारा दिला आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माजी एअर मार्शलचा हा खुलासा पाकिस्तानसाठी केवळ लाजिरवाणा नाही, तर पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचे प्रतीक मानले जात आहे. भारताच्या या निर्णायक पावलामुळे दक्षिण आशियात सामरिक गणिते नव्याने आखली जात आहेत, आणि भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला कोठेही थारा दिला गेला तर त्याचा अचूक आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.

Web Title: Indias brahmos missile destroyed pakistani air base reveals former pakistani military officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • india
  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • pakistan

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख
1

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Railway News: मोदी सरकारकडून तीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, चार राज्यांमध्ये ३८९ किलोमीटरचे नवीन रेल्वे नेटवर्क
2

Railway News: मोदी सरकारकडून तीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, चार राज्यांमध्ये ३८९ किलोमीटरचे नवीन रेल्वे नेटवर्क

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र  क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान
3

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?
4

Bharat bandh : १२ फेब्रुवारीला भारत बंद! बँका, शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा बंद राहणार का? काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.