
फोटो सौजन्य AI
धोरणात्मतक दृष्टिकोनातून चाबहार इराणसाठी खूप महत्त्वाचे आहे. हे होर्मुझ सामुद्रधुनीच्या बाहेर इराणचे एकमेव खोल पाण्याचे बंदर आहे जे इराणला आखातून न जाता थेट हिंदी महासागरापर्यंत प्रवेश देते. हे भारताच्या सहकार्याने बनलेल्या चाबहार कॉरिडॉरचे मुख्य केंद्र देखील आहे जे पाकिस्तानला पूर्णपणे डावलून इराणला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी जोडते. सध्या हे स्पष्ट झालेले नाही की हा हल्ला ज्या ठिकाणी भारताचा प्रकल्प आहे तिथे झाला आहे का?
चाबहार बंदर हे खूप वर्षांपासून भारत सरकार विकसित करत आहे . २३ मे २०१६ ला भारत सरकार आणि इराण यांच्यात करार झाला होता . डिसेंबर २०१७ मध्ये भारताच्या साहाय्याने पाहिलं जहाज हे या बंदरावरून अफगाणिस्थान ला पाठवण्यात आले होते . हे बंदर भारताचे ड्रीम प्रोजेक्ट आहे . कारण यामुळे भारत पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तान , रशिया आणि मध्य आशियाला जोडला जातो . २०२४ मध्ये इराणसोबत करार करून भारताने हे बंदर दहा वर्षांसाठी चालवायला घेतले आहे . हे बंदर बंद पडल्यास भारताला आखाती देशाकडून तेल वाहतुकीला अडथळा निर्माण होईल , परिणामी भारतात तेलाची महागाई होईल . हि भारतासाठी चिंतेची बाब आहे . या बंदराचा वापर भारत हा अफगाणिस्तान मध्ये गहू , साखर , औषधं पाठवण्यासाठी करत आला आहे . तसं पाहिलं तर हे बंदर इराणचे असून भारताने पैसा टाकून आणि बांधकाम करून हे पूर्णपणे विकसित आणि कार्यान्वित केले आहे .
ही बातमी तेव्हा आली जेव्हा फार्स न्यूज एजन्सीने प्रांतातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की इराणच्या नैऋत्येकडील खुजेस्तान प्रांतात गव्हाच्या साठवणुकीसाठी असलेल्या एका सायलोवर आणि दुसऱ्या एका ठिकाणी रात्री अमेरिकन प्रक्षेपकांद्वारे हल्ला झाला. होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. इराणने इस्लामाबाद शांतता चर्चेला समाप्त करण्याची घोषणा केली आहे.