कुवैतमध्ये एका रहिवाशी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक भारतीयांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. कुवैतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात बुधवारी (12 जून) सकाळी सहा मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या इमारतीत ही भीषण आग लागली त्या इमारतीत 160 लोक राहत होते आणि ते सर्व एकाच संस्थेत काम करतात. यातील अनेक मजूर भारतातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी
कुवैतमधील भारतीय दूतावासाने याबाबत एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. दूतावासाचे म्हणणे आहे की, या आगीत भारतीयांच्या मृत्यूची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक +965-65505246 वर संपर्क साधता येईल. दूतावासाकडून शक्य ती सर्व मदत जाहीर करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केला शोक
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ‘कुवैतमधील आगीच्या घटनेने मी दुखावलो आहे. या घटनेत 40 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण रुग्णालयात दाखल आहेत. आमचे राजदूत शिबिरात गेले आहेत. आम्ही पुढील माहितीची वाट पाहत आहोत.’ जे जखमी झाले आहेत ते लवकरच पूर्ण बरे होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कुवैतमध्ये सुमारे 10 लाख भारतीय राहतात, त्यापैकी सुमारे 9 लाख भारतीय तेथे काम करतात.






