Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये सिंधू जल कराराचा प्रश्न उपस्थित केल्यास कोणता देश भारताच्या बाजून असेल?

ही सर्व परिस्थिती पाहाता भारताकडे रशिया आणि फ्रान्सचा पूर्णपणे पाठिंबा दिसून येत आहे. तर अमेरिका आणि ब्रिटन दोन्ही देशांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतील. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2025 | 11:45 PM
Pahalgam Terror Attack Which country will side with India if Pakistan raises the Indus Water Treaty issue in the United Nations

Pahalgam Terror Attack Which country will side with India if Pakistan raises the Indus Water Treaty issue in the United Nations

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात दु:खाचे आणि संतापाचे वातावरण पसरलेले आहे. या हल्ल्याची जबाबादारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) ने म्हणजेच ‘द रेझिस्टंट फ्री’ ने घेतला आहे. यामुळे भारताने पाकिस्तान दहशतवादला प्रोत्साहन देणे थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली आहे.

भारत सरकारने पाकिस्तानविरोधात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे भारताने सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानने देखील शिमला कराराला स्थगिती दिली आहे. परंतु हे दिसते तेवढे सोपे नाही. 1960 मध्ये जागतिक बॅंकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार करण्यात आला होता. हा करार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या म्हणजेच रावी, सतलज, बियास, चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांच्या पाणी वापरावर नियंत्रण ठेवते. या नद्या भारतातून पाकिस्तानमध्ये वाहत जातात. परंतु हा करार स्थगित केला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी थांबवणे कठीण आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्णाण होऊ शकते. यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात कालवे आणि धरणे बांधावे लागतील. यासाठी किमान 10 वर्ष लागतली.

Pahalgam Terror Attack: चीनचा पाकिस्तानला पाठिंबा? पहलगाम हल्ल्यानंतर ड्रॅगनचा पाकला शस्त्र पुरवठा, भारताच्या चिंतेत वाढ

याच वेळी या कराराच्या स्थगितीनंतर पाकिस्तान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करु शकतो. जगातील सर्व शक्तिशाली देशांना पहलगाम हलल्याचा विरोध केला आहे. परंतु राजनैतिकदृष्ट्या एखाद्या देशाचा पाठिंबा हा अनेक मुद्द्यांवर अवलंबून असतो. यामध्ये व्यापर, राजनैतिक संबंध, तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार केला जातो. तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये व्हेटो देश कोणच्या बाजूने असतील हे देखील महत्वाचे ठरते.

व्हेटो पॉवर असलेले देश कोणाची बाजू घेणार?

व्हेटो पॉवर असलेल्या देशांमध्ये अमेरिका, चीन, रशिया, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सचा समावेश आहे. यामुळे सिंधू जल कराराच्या मुद्दयावर कोणता देश कोणाची बाजू घेईल हे अत्यंत महत्वाच आहे. यामध्ये भू-राजकीय हितसंबंध, ऐतिहासिक संबंध आणि सिंधू जल कराराच्या मुद्दयावर कोणता देश कोणाची बाजू घेईल हे अत्यंत महत्वाच आहे. यामध्ये भू-राजकीय हितसंबंध, ऐतिहासिक संबंध आणि भारत-पाकमधील प्रादेशिक रणनीतींचा विचार करण्यात येईल. सध्या चीन वगळता भारताचे सर्व देशांशी चांगले संबंध आहेत. तसेच अलीकडच्या काळात चीनशी देखील संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत. परंतु गेल्या काही दिवसांतील पाकिस्तान आणि चीनमधील वाढती जवळीक पाहता चीन हा पाकिस्तानसाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताविरोधात महत्वाचा खेळाडू ठरु शकतो. चीनने आपली भूमिका पाकिस्तानच्या बाजूने घेतल्यास भारताला अनेक आव्हाने आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अमेरिका

अमेरिका आणि भारतामधील संबंध अधिक दृढ आहेत. अमेरिकेने भारताला आपला धोरणात्मक भागीदार मानले आहे. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये अमेरिका चीनविरोधी भूमिकेत राहिला आहे. तसेच भारत ही सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आणि एक मोठी बाजारपेठ आहे. तसेच क्वाड संघटनामध्ये भारतासोबत अमेरिकेचे मजबूत संरक्षण आणि आर्थिक संबंध आहेत. यामुळे अमेरिका बारताला पाठिंबा देऊ शकतो. पंरतु काही तज्ञांच्या मते अमेरिका विश्वासहार्य नाही. अमेरिकेचे पाकिस्तानशी असलेले संबंध अफगाणिस्तान आणि दहशतवादविरोधी कारवायांसाठी महत्वाचे आहेत.

रशिया

सोव्हिएच युनियनच्या काळापासून भारताचे रशियासोबत संबंध अधिक दृढ होत गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि उर्जा क्षेत्रातही मजबूत संबंध आहेत. रशिया हा भारताचा विश्वासू भागीदार आहे. तसेच अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारताने युक्रेन युद्धच्या पार्श्वभूमीवर रशियाचा निषेध कधीच केला नाही. ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटनांमध्ये दोन्ही देशांनी व्यासपीठांवर एकमेकांना सहकार्य केले आहे. यामुळे रशियाचा पाठिंबा भारताच्या बाजूने असेल अशी अपेक्षा आहे. रशिया पाकिस्तानला आपला मित्र मानतो, परंतु UN मध्ये रशिया धोरणात्मक हितसंबंधांना प्राधान्य देईल.

चीन

चीन नेहमीच पाकिस्तानचा मित्र राहिला आहे. अलीकडच्या काही काळात चीनचे भारतासोबतचा तणाव कमी झाला आहे. पहलगाम हल्ल्याचा देखील चीनने निषेध केला आहे. परंतु चीनला मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान हा महत्वाचा मार्ग आहे. तसेच चीनने CPEC द्वारे पाकिस्तानमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केला आहे. तसेच भारत आणि चीनमधील सीमावद शांत झाला असला तरी, हा वाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

ब्रिटन

ब्रिटनचे भारत आणि पाकिस्तानशी संबंध अधिक मजबूत आहेत. भारत हा ब्रिटनसाठी महत्वाचा व्यापरी भागीदार आहे तर पाकिस्तानची मोठी लोकसंख्या ब्रिटनमध्ये आहे. यामुळे पाकिस्तानविरोधात उघडपणे विरोध दर्शवणे ब्रिटनसाठी कठीण असेल.

फ्रान्स 

फ्रान्स आणि भारतामधील संरक्षण आणि धोरणात्मक संबंध अधिक- मजबूत आहेत. अलीकडेच भारताने फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी रकेली आहेय. तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों आणि पंतप्रधान मोदींमधील संबंध देखील दृढ आहेत. पाकिस्तान आणि फ्रान्सचे संबंध मर्यादित आहेत. तसेच फ्रान्से नेहमीच दहशतवाद आणि इस्लामिक कट्टरवादाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे पाकिस्तानला फ्रान्सचा पाठिंबा मिळणे कठीण आहे.

यामुळे ही सर्व परिस्थिती पाहाता भारताकडे रशिया आणि फ्रान्सचा पूर्णपणे पाठिंबा दिसून येत आहे. तर अमेरिका आणि ब्रिटन दोन्ही देशांमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतील. परंतु यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती; जाणून घ्या लष्करी ताकदीमध्ये कोण आहे वरचढ?

Web Title: Pahalgam terror attack which country will side with india if pakistan raises the indus water treaty issue in the united nations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 11:45 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का
1

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
2

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
3

कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
4

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.