Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Army Chief: भारताचा स्पष्ट संदेश, सहनशक्ती संपली! पाक लष्करप्रमुख असीम मुनीर मात्र चिंतेत

Asim Munir India : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 03, 2025 | 12:08 PM
Pakistan Army Chief Asim Munir worried due to India's concrete action

Pakistan Army Chief Asim Munir worried due to India's concrete action

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan Army Chief warning : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. विशेषतः पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर या कारवाईचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव आणि डोळ्यांत दिसणारी भीती यावरून पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाची चिंता लपून राहिलेली नाही.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर हल्ला केला, ज्यात काही जणांचा क्रूरपणे बळी गेला. या अमानुष कृत्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने कठोर भूमिका घेतली असून, दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पाकिस्तानमध्ये घबराट – लष्करी बैठकीत तणावाचे वातावरण

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराने रावळपिंडीमध्ये महत्त्वाची ‘कॉर्प्स कमांडर परिषद’ आयोजित केली. या बैठकीस जनरल असीम मुनीर आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीत उपस्थित सर्व लष्करी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता, तणाव आणि अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती.

या बैठकीशी संबंधित एका छायाचित्रात टेबलावर ठेवलेली डायरी, कागदपत्रे आणि लॅपटॉप यावरून सध्याच्या परिस्थितीबाबत गंभीर चर्चा होत असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः असीम मुनीर यांचे चेहऱ्याचे बदलते रंग, खोल गेलेले डोळे आणि चेहऱ्यावरचे तणावाचे रेषा यांनी त्यांच्या अंतर्गत घबराटीची साक्ष दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cosmos 482 पृथ्वीवर परतणार! 50 वर्षांनंतर सोव्हिएत यानाचा पृथ्वीवर परतणार, भारताला किती धोका?

सिंधू पाणी करार स्थगितीचा परिणाम – पाकिस्तान अस्वस्थ

भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला, जो पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक आणि अस्वस्थ करणारा आहे. या कराराखाली पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चेनाब नद्यांचे पाणी मिळत होते. भारताने हा करार स्थगित करताच पाकिस्तानचे २४ कोटी नागरिक जलसंकटाच्या छायेत गेले आहेत, अशी चिंता असीम मुनीर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “भारत पाण्याचा वापर आता शस्त्र म्हणून करत आहे,” आणि ही कृती युद्धसदृश आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ही कृती प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आणणारी असून भारताच्या निर्णयामुळे दहशतवादी कृत्यांच्या समर्थनाची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागत आहे.

भारताची लष्करी तयारी – नियंत्रण रेषेवर बंदोबस्त वाढवला

भारत सरकारने यानंतर नियंत्रण रेषेवरील सैनिकी तैनाती आणखी मजबूत केली आहे. रात्रीच्या वेळी ड्रोनच्या साहाय्याने सतत गस्त ठेवली जात आहे, तर अनेक ठिकाणी नवीन तंत्रज्ञानावर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, “भारत आता कोणतेही दहशतवादी कृत्य सहन करणार नाही. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना थेट उत्तर दिले जाईल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताला ‘Hawkeye 360’ प्रणालीसाठी अमेरिकेची मान्यता; सागरी सुरक्षेत होणार क्रांतिकारी बदल

भारताचा स्पष्ट संदेश, सहनशक्ती संपली!

भारताच्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानला मोठ्या आंतरराष्ट्रीय आणि आंतरिक दबावाला सामोरे जावे लागत आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने जो धाडसी आणि ठाम निर्णय घेतला आहे, त्यातून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या शक्तींना कडक संदेश मिळाला आहे – “आता बस झालं!”

या साऱ्या घडामोडींमुळे पाक लष्करप्रमुख असीम मुनीर आणि त्यांचे सहकारी पूर्णपणे दबावाखाली आहेत, याबाबत कोणतेही दुमत नाही. भारताची प्रतिउत्तर देण्याची तयारी, आणि सिंधू पाणी करारासारखे निर्णायक निर्णय – हे सारे दहशतवादविरोधी लढ्यात भारताचा नव्या युगातला निर्धार दर्शवतात.

Web Title: Pakistan army chief asim munir worried due to indias concrete action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • international news
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
1

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Ranil Wickremesinghe यांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव
2

Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव

China-Taliban Kabul deal : नवे जागतिक गणित! काबूल बैठकीत चीन-पाकिस्तान नात्याला तडा? अफगाणिस्तानने दिला अनपेक्षित धक्का
3

China-Taliban Kabul deal : नवे जागतिक गणित! काबूल बैठकीत चीन-पाकिस्तान नात्याला तडा? अफगाणिस्तानने दिला अनपेक्षित धक्का

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
4

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.