Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर संकट; आर्थिक सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर!

गेल्या काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर गदा येईल, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे सर्व स्तरातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता आज संसदेत सादर झालेल्या देशाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देखील याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शोधानंतर सर्व प्रकारच्या कामगारांवर होणाऱ्या परिणामाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 22, 2024 | 06:56 PM
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर संकट; आर्थिक सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर!

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर संकट; आर्थिक सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर!

Follow Us
Close
Follow Us:

मागील काही काळापासून जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगार संकटाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आज (ता.२२) संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणातही जगभरात वाढत असलेल्या एआयच्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने तयार केलेले आर्थिक सर्वेक्षण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केले. सर्वेक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लागल्यानंतर सर्व प्रकारच्या कामगारांवर होणाऱ्या परिणामाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

काय म्हटलंय आर्थिक सर्वेक्षण अहवालात?

येत्या काही वर्षांत आणि दशकांमध्ये भारताच्या उच्च विकास दर वाढीमध्ये एआयचा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. याला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्र यांना भागीदारीत काम करावे लागणार आहे, असेही आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात सुचवण्यात आले आहे.

24 तास आधीच पीएम मोदींनी सांगितले, कसा असेल देशाचा अर्थसंकल्प; वाचा… कोणत्या बाबींवर असेल फोकस?

इकॉनॉमिक सर्व्हेने ‘द इकॉनॉमिस्ट’ मासिकाच्या एका स्वतंत्र संशोधन लेखाचा दाखला देत म्हटले आहे की, देशाची सेवा क्षेत्रातील निर्यात पुढील दशकात हळूहळू नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकते. टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट बूममुळे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगला चालना मिळाली, परंतु तंत्रज्ञानाच्या पातळीवर येणारा बदलाचा पुढील टप्पा थांबवला जाण्याची शक्यता आहे.

कॉर्पोरेट क्षेत्राची समाजाप्रती जबाबदारी

आर्थिक सर्वेक्षणात सरकारने म्हटले आहे की, या सर्वांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राची समाजाप्रती मोठी जबाबदारी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स श्रमाला चालना कशी देऊ शकते? नाहीशी कशी करू शकते? याचा विचार कॉर्पोरेट क्षेत्राला करावा लागणार आहे. सर्वेक्षणानुसार, गेल्या दोन वर्षांत आयटी क्षेत्रात नोकर भरतीत घट झाली आहे.

आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कमी किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थेची अगदी शेवटची गरज आहे. या सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नोटचाही दाखला देण्यात आला असून, आयएमएफच्या माहितीनुसार जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगाराच्या संकटासोबत असमानतेचाही धोका वाढला आहे.

Web Title: Economic survey 2024 artificial intelligence threats jobs nirmala sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 06:52 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
1

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Nirmala Sitharaman: आव्हानांच्या तोंडावर विकसित भारताचे लक्ष्य कसे साध्य करणार? निर्मला सीतारमण यांनी सांगितली रणनीती
2

Nirmala Sitharaman: आव्हानांच्या तोंडावर विकसित भारताचे लक्ष्य कसे साध्य करणार? निर्मला सीतारमण यांनी सांगितली रणनीती

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!
3

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!

Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?
4

Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.