
(फोटो सौजन्य: Chatgpt)
याबाबत केंद्र सरकारने १ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यांना कर वाटपाचा अतिरिक्त हप्ता वितरित केला आहे. ही रक्कम १० ऑगस्ट रोजी वितरित केलेल्या नियमित मासिक हप्त्यापेक्षा वेगळी आहे. नेमकं काय आहे वेगळेपण? आणि कोणत्या राज्याला किती निधी मिळाला आहे? सविस्तर जाणून घेऊयात.
अर्थ मंत्रालयाच्या मते, केंद्र सरकारने गोळा केलेल्या एकूण कर महसुलापैकी ४१% रक्कम राज्यांना दिली जाते. ही रक्कम संपूर्ण आर्थिक वर्षात १४ हप्त्यांमध्ये राज्यांना वितरित केली जाते. यामुळे राज्यांना त्यांच्या कार्यक्रमांसाठी आणि सणांच्या आधी अतिरिक्त निधी उपलब्ध होतो आणि ज्यामुळे त्यांना त्यांच्या खर्चाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येतो. हा निधी विकासकामांसाठी वापरता येतो ज्यामुळे राज्याची वाटचाल व्यवस्थित होते.
या अतिरिक्त हप्त्यात उत्तर प्रदेशला सर्वाधिक रक्कम मिळाली. देशातील इतर प्रमुख राज्यांनाही भरीव रक्कम मिळाली.
उत्तर प्रदेश: अंदाजे ₹१९,२०८ कोटी
बिहार: अंदाजे ₹१०,८४५ कोटी
मध्य प्रदेश: अंदाजे ₹८,०१० कोटी
पश्चिम बंगाल: अंदाजे ₹७,८६६ कोटी
महाराष्ट्र: अंदाजे ₹७,०२२ कोटी
केंद्र सरकारने जारी केलेली ही अतिरिक्त रक्कम राज्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने आहे. याशिवाय, सण, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सरकारी योजनांदरम्यान वाढलेल्या खर्चासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे देश राज्यासह जनतेला याचा लाभ चांगला मिळू शकतो. त्यामुळे हा निधी राज्यासोबतच जनतेसाठी ही तितकाच महत्त्वाचा आहे.