
AI-Human Intelligence: नोकऱ्या जातील, पण संधी वाढतील; एआयबाबत सिस्कोचा स्पष्ट इशारा (photo-social media)
AI-Human Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) मानव असंबद्ध होतील, ही चुकीची भीती आहे. मानवी निर्णयक्षमता आणि मशीन-स्तरीय ऑटोमेशन एकत्र करण्यात खरे यश आहे, त्यामुळे मानवी क्षमतांना बळकटी मिळून प्रगती साधता येईल, असे अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी सिस्कोचे अध्यक्ष आणि मुख्य उत्पादन अधिकारी जीतू पटेल यांनी सांगितले. प्रत्यक्षात, जेव्हा तुम्ही मानवी बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता एआयच्या मोठ्या प्रमाणात ऑटोमेशनशी जोडता तेव्हा जादू घडते. एआय प्रणाली वेगाने प्रगती होत आहे. चॅटबॉट्सपासून ते स्वायत्त एजंट्सपर्यंत जे स्वतःहून निर्णय घेऊ शकतात, ही साधने मानवी क्षमता वाढवण्यासाठी डिझाइन केली आहेत, त्यांना बदलण्यासाठी केलेली नाही, असे पटेल म्हणाले.
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर
वाढत्या ऑटोमेशनमुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल आणि काही भूमिका संपुष्टात येतील, परंतु नवीन उद्योग आणि संधी देखील उदयास येतील, असे सिस्कोचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणाले. काही नोकऱ्या गायब होऊ शकतात. प्रत्येक नोकरीचे स्वरूप बदलेल, परंतु, एआय नवीन उद्योग निर्माण करेल, जे पूर्वी कधीही अस्तित्वात नव्हते. हे आपल्याला समाजात वेगवेगळ्या प्रकारे योगदान देण्याची संधी देईल, एआय मानवांना कामापासून वंचित करेल, ही धारणा अंत्यत चुकीची आहे. एआय जबाबदारीने विकसित केले गेले, तर ते मानवी क्षमता वाढवू शकतात, कारण मानवांमध्ये निर्माण करण्याची, योगदान देण्याची आणि मूल्य जोडण्याची नैसर्गिक इच्छा असते.
मानवी सर्जनशीलता इतकी खोलवर रुजलेली आहे की, समाज केवळ यंत्रांवर आपली कामे सोपवू शकत नाही. जरी एआय कालांतराने असाधारण क्षमता विकसित करत असला तरी, त्यामुळे मानवी योगदानाची प्रासंगिकता नष्ट होणार नाही. खरी चर्चा एआय किती शक्तिशाली होईल, ही नव्हे, तर मानव त्यांचे मूल्य गमावतील का हा आहे. सहानुभूती, सर्जनशीलता आणि समाजात योगदान देण्याची प्रवृत्ती मशीनद्वारे अनुकरण केली जाऊ शकत नाही. जटिल कामे करण्यासाठी एआयला प्रशिक्षित केले जाऊ शकते, परंतु कनेक्शन, काळजी आणि निर्णय घेण्याची मानवी इच्छा अद्वितीय आहे. एआय ‘डिजिटल सहकारी’ म्हणून कामाच्या ठिकाणी असताना, इष्टतम परिणाम साध्य करण्यासाठी मानवी देखरेख आणि भागीदारी आवश्यक असेल, असे ते म्हणाले.
एआयची प्रगती म्हणजे समाजातील मानवी योगदानाचा अंत असणे चुकीची धारणा आहे. आपण मशीन स्तरीय क्षमतांसाठी एआयचा वापर करायला हवा. पंरतु, ते अत्यंत मानव केंद्रित दृष्टिकोनाने करावे. जग सध्या एआय विकासाच्या दुसऱ्या मोठ्या टप्प्यात आहे. पहिला टप्पा चॅटबॉट्सचा होता, जो प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम होता. ‘ते सुरुवातीला जादूसारखे वाटले, मात्र लवकरच ते सामान्य वाटायला लागेल. असे ते म्हणाले. त्यांनी वेमोच्या स्वयं-ड्रायव्हिंग कारचा वापर परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या मानवी क्षमतेचे उदाहरण म्हणून केला. पहिल्यांदाच ड्रायव्हरलेस कारमध्ये बसणे असामान्य वाटत असले तरी, काही प्रयत्नांनंतर ते सामान्य होते. तांत्रिक बदलाच्या गतीने, मानवांची अनुकूलता देखील वेगवान होत राहील आणि आज विज्ञानकथेसारखे वाटणारे लवकरच सामान्य होईल.