Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमीभाव कायद्यासाठी सरकारला घेरणार; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शेतकरी नेत्यांना शब्द!

आज किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी संघटनांच्या १२ सदस्यीय शिष्टमंडळाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी "देशातील शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदा लागू करण्यासाठी अर्थात त्यांच्या पिकांना निश्चित हमी देण्यासाठी सरकारवर दबाव आणू." असा शब्द शेतकऱ्यांना दिला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 24, 2024 | 06:09 PM
हमीभाव कायद्यासाठी सरकारला घेरणार; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शेतकरी नेत्यांना शब्द!

हमीभाव कायद्यासाठी सरकारला घेरणार; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शेतकरी नेत्यांना शब्द!

Follow Us
Close
Follow Us:

“काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात कायद्याने शेतकऱ्याने हमीभाव मिळण्यासाठी पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने असेल. असे म्हटले होते. विशेष म्हणजे पक्षाने यासाठी एक मूल्यांकन केले आहे आणि ते लागू केले जाऊ शकते. याबाबत पक्षाची नुकतीच एक बैठक घेण्यात आली आहे, ज्यामध्ये आम्ही इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांशी चर्चा करू आणि देशातील शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदा लागू करण्यासाठी अर्थात त्यांच्या पिकांना निश्चित हमी देण्यासाठी सरकारवर दबाव आणू.” असे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

१२ सदस्यीय शिष्टमंडळाने घेतली भेट

आज (ता.२४) शेतकरी नेत्यांच्या १२ सदस्यीय शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची संसदेत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरी हमीभाव कायद्यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनामागे असलेलया प्रमुख शेतकरी संघटना किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाने नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत लोकसभेत हमीभाव कायद्यासाठीचे विधेयक मांडण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा : अर्थसंकल्पात ‘या’ राज्याला मिळाला सर्वाधिक निधी; वाचा… राज्यनिहाय यादी!

शेतकऱ्यांसाठी सरकारला संसदेत घेरणार

याच पार्श्वभूमीवर आज या संघटनांच्या १२ सदस्यीय शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली. अशातच या बैठकीत किमान आधारभूत किंमतीसाठी (एमएसपी) सरकारवर दबाव आणण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांना शब्द देत म्हटले आहे आहे की, काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना सोबा आपण शेतकऱ्यांसाठी सरकारला संसदेत घेरू, असा शब्दही त्यांनी शेतकरी नेत्यांना दिला आहे.

पंतप्रधानांना जाब विचारणार

यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. या बैठकीला काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल, अमरिंदर सिंग राजा वारिंग, सुखजिंदर सिंग रंधावा, गुरजित सिंग औजला, धर्मवीर गांधी, डॉ. अमर सिंग, दीपेंदर सिंग हुडा आणि जय प्रकाश हेही उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी नेत्यांना आज (ता.२४) आपल्या भेटीसाठी संसदेत प्रवेश दिला जात नव्हता. यावरून देखील आपण पंतप्रधानांना जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Web Title: Rahul gandhi promised the farmers leader that he will ask questions to the modi government about msp law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • Modi government
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.