Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हमीभाव कायद्यावरून राहुल गांधींची पलटी? लोकसभा निवडणूक घोषणापत्रात दिले होते आश्वासन!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली. ही नवसंजीवनी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना आपल्या निवडणुकीत घोषणापत्रात भरीव स्थान दिल्याने मिळाली. मात्र, आता लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर राहुल गांधींना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांचा विसर पडला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 29, 2024 | 04:41 PM
हमीभाव कायद्यावरून राहुल गांधींची पलटी? लोकसभा निवडणूक घोषणापत्रात दिले होते आश्वासन!

हमीभाव कायद्यावरून राहुल गांधींची पलटी? लोकसभा निवडणूक घोषणापत्रात दिले होते आश्वासन!

Follow Us
Close
Follow Us:

१७ वी लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांमुळे गाजली. विशेष म्हणजे या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना निवडणूक घोषणापत्रात भरीव स्थान दिल्याने कॉग्रेस पक्षाला चांगले यश देखील मिळाले. तर सत्ताधारी भाजपला मोठा फटका सहन करावा लागला. मात्र, आता काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचा विसर पडलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लोकसभा निवणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने हमीभाव कायद्यासाठी उगारलेली तलवार, म्यान झाली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे काँग्रेस पक्षाला उभारी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होत, आतापर्यंत लोकसभेत अनेक मुद्दे उचलून धरले. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना कुठेही स्थान दिल्याचे आढळून आले नाही. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर हमीभाव कायद्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. मात्र, असे असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेच्या मुद्द्यावर भर दिला आहे. आणि नीट परीक्षेच्या मुद्द्यावर भर देणे योग्यही आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली. त्या शेतकऱ्यांच्या हमीभाव कायद्यासह अन्य मुद्द्यांचा काँग्रेसला विसर पडला की काय? अशी कुजबुज सध्या शेती क्षेत्रातील जाणकारांमध्ये पाहायला मिळत आहे.

बैठकीत हमीभाव कायद्याचा विसर

दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, लोकसभेच्या विशेष अधिवेशनाबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री महत्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी विरोधकांच्या मुद्द्यांवर मतदान केले. ज्यामध्ये नीट परीक्षा, अग्निवीर या विषयांसह महागाई तसेच किमान आधारभूत किमतींबाबत (एमएसपी) चर्चा झाली. त्यामुळे आता संसदेत हमीभाव कायद्याचा मुद्दा उचलून धरण्याबाबत काँग्रेस पक्ष मागे हटतोय की काय? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

कोणत्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी हमीभाव कायदयाच्या मुद्द्यावरून एनडीएची साथ सोडत, काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची वाट धरली होती. याच हनुमान बेनीवाल यांनी खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर नीट परीक्षा, अग्निवीर, महागाई, एमएसपी दर हे इंडिया आघाडीचे विरोधाचे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, असे माध्यमांना सांगितले आहे. तसेच ईडी, सीबीआय यांसारख्या सरकारी एजन्सीचा गैरवापर हा देखील कळीचा मुद्दा असणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे. परिणामी, आता हनुमान बेनीवाल यांच्या माहितीनंतर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या एमएसपीसह हमीभाव कायदयाच्या मुद्द्यावरून पलटी मारत आहे की काय? या मुद्द्याला बळ मिळत आहे.

Web Title: Rahul gandhis flip over msp guarantee act promise during lok sabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 04:41 PM

Topics:  

  • Naredra Modi
  • Parliament session
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.