Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI मुळे पुढील ५ वर्षांत ८० टक्के लोकांच्या नोकऱ्या जाणार, अब्जाधीश विनोद कोसला यांचे धक्कादायक भाकीत 

एआयमुळे सरसकट सगळयांच्या नोकऱ्या जातील, अशी चर्चा मागील काही काळापासून सुरु आहे. अशातच आता अब्जाधीश विनोद कोसला यांनी एक धक्कादायक भाकीत केले आहे.  

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2025 | 11:40 AM
AI मुळे पुढील ५ वर्षांत ८० टक्के लोकांच्या नोकऱ्या जाणार, अब्जाधीश विनोद कोसला यांचे धक्कादायक भाकीत (फोटो सौजन्य-X)

AI मुळे पुढील ५ वर्षांत ८० टक्के लोकांच्या नोकऱ्या जाणार, अब्जाधीश विनोद कोसला यांचे धक्कादायक भाकीत (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • AI चा वापर वाढल्याने नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता
  • पुढील ५ वर्षांत ८० टक्के नोकऱ्या जातील.
  • भारतीय अमेरिकन गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा अंदाज
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढल्याने नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार, अशी चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. एआयचा वापर वाढल्यापासूनच तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी अशी चर्चा आहे. परिणामी काहींना नोकऱ्या जातील अशी भीती वाटते, तर काहींना वाटते की त्यामुळे सर्व काम सोपे आणि पारदर्शक होईल. दरम्यान, भारतीय अमेरिकन गुंतवणूकदार विनोद खोसला यांनी एक मोठा अंदाज  व्यक्त केला आहे. विनोद खोसला यांचे मते, पुढील ५ वर्षांत ८० टक्के नोकऱ्या जातील. या कामांमध्ये गुंतलेल्या लोकांचे काम आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे होऊ लागेल, परिणाम याचा फटका नोकरदारांना बसू शकतो, असं भाकित खोसला यांनी व्यक्त केलं आहे.

Air Force च्या नोकरीचा अर्ज करण्याची शेवटची संधी, IAF Agniveer Vayu Registration 2025 कसे कराल

इतकेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली आणि सांगितले की, भविष्यातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ बनण्याऐवजी सामान्यवादी व्हावे लागेल, म्हणजेच त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान असावे लागेल. विनोद खोसला यांनी एक आशादायक गोष्ट देखील सांगितली. खोसला यांचे मते, जरी अनेक विद्यमान नोकऱ्या गेल्या असतील तरी, यामुळे काही संधी निर्माण होतील हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. अशा संधी देखील निर्माण होतील ज्यांचा आपण आज विचारही करू शकत नाही. अनेक उत्तम नोकऱ्या आहेत ज्या मनुष्यचं करु शकतात. त्या नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने केल्या जातील. अशा सुमारे ८० टक्के नोकऱ्या असतील.

एआयमुळे  २०४० पर्यंत अनेक गोष्टी बदलतील. परिस्थिती अशी असेल की अनेक नोकऱ्या संपतील. जर कोणी त्या करू इच्छित असेल तर तो त्यांचा छंद असेल, परंतु गरज भासणार नाही. विनोद खोसला यांचा हा अंदाज अशा वेळी आला आहे जेव्हा मोठ्या टेक कंपन्यांमध्ये कपातीचा टप्पा सुरू आहे. या कंपन्या म्हणतात की ते कर्मचाऱ्यांची पुनर्रचना करत आहेत, परंतु सत्य हे आहे की परिस्थिती बदलत आहे. अलिकडेच, देशातील सर्वात मोठी टेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएसने १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, धोरणांमध्ये काही बदल करण्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे भविष्यातही नोकऱ्या धोक्यात राहतील, असं मत विनोद खोसला यांनी व्यक्त केलं आहे.

टीसीएसने दिला १२ हजार जणांना नारळ?

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली. कंपनीने चालू आर्थिक वर्षात त्यांच्या २ टक्के कर्मचाऱ्यांना कपात करण्याची घोषणा केली आहे, म्हणजेच सुमारे १२ हजार लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील. आता कर्नाटक राज्य आयटी कर्मचारी संघटनेने (केआयटीयू) या प्रस्तावित कपातीला विरोध केला आहे आणि म्हटले आहे की कंपनीने राज्य नियमांचे उल्लंघन केले आहे. कर्मचारी संघटनेने कंपनीविरुद्ध खटलाही सुरू केला आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या प्रस्तावित कपातीविरोधात केआयटीयूने औद्योगिक वाद दाखल केला आहे. औद्योगिक वाद कायदा, १९४७ आणि कर्नाटक सरकारने सेवा तपशील अहवाल देण्यावर लादलेल्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी कामगार विभागाला केले आहे. केआयटीयूच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त कामगार आयुक्त जी मंजुनाथ यांची भेट घेतली आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारींचा हवाला देत तक्रार सादर केली. त्यात म्हटले आहे की टीसीएसचे प्रस्तावित कपात पूर्णपणे नियमांविरुद्ध आहे.

‘बिजप्रॉस्पेक्ट्स’चा यशस्वी प्रवास; मुर्तजा अमीन यांची संघर्षमय कहाणी

Web Title: 80 percent jobs will go due to artificial intelligence big claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • india
  • Job

संबंधित बातम्या

Indian Railway Job: असिस्टंट लोको पायलट भरतीत मोठा बदल; RRB ALP भरतीच्या जागा कमी, रेल्वेने जारी केली सुधारित नोटीस
1

Indian Railway Job: असिस्टंट लोको पायलट भरतीत मोठा बदल; RRB ALP भरतीच्या जागा कमी, रेल्वेने जारी केली सुधारित नोटीस

Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! देशातील सर्व विमानतळ आणि बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू; कडक निर्देश जारी
2

Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! देशातील सर्व विमानतळ आणि बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू; कडक निर्देश जारी

Underwater Tourism : स्कुबा डायव्हिंगपासून अंडरवॉटर फोटोग्राफीपर्यंत सर्व काही! सिंधुदुर्गात साकारतोय भव्य सागरी पर्यटन प्रकल्प 
3

Underwater Tourism : स्कुबा डायव्हिंगपासून अंडरवॉटर फोटोग्राफीपर्यंत सर्व काही! सिंधुदुर्गात साकारतोय भव्य सागरी पर्यटन प्रकल्प 

Devendra Fadnavis : सायप्रसच्या उद्योगांना महाराष्ट्राची खुली ऑफर! गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : सायप्रसच्या उद्योगांना महाराष्ट्राची खुली ऑफर! गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.