Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्व शाळांत तिसरीपासून ‘एआय’! एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण

एआयच्या मदतीने भारतातील शिक्षण प्रणालीत मोठा बदल होणार आहे. आता विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही तंत्रज्ञानाच्या नव्या युगासाठी अधिक सज्ज होतील.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 01, 2025 | 04:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारत सरकारने शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि भविष्याभिमुख निर्णय घेतला आहे. आता देशातील सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शिकवले जाणार आहे. हा विषय २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून अधिकृतपणे अभ्यासक्रमात समाविष्ट होईल. उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांमध्ये एआय विषय समाविष्ट करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील दोन वर्षांत अभ्यासक्रम तयार करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि शिक्षण साधने उपलब्ध करणे या सर्व टप्प्यांची पूर्तता केली जाणार आहे.

ग्राफिक डिझाईनिंगमध्ये करायचे आहे करिअर? मग पहिले ‘हे’ वाचा

या उपक्रमासाठी सीबीएसई (CBSE)ने आधीच पुढाकार घेतला आहे. आयआयटी मद्रासचे प्रा. कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती वर्गनिहाय एआय अभ्यासक्रम तयार करत असून, विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर एआयचा नैतिक वापर या विषयावर भर देणार आहे. त्याबद्दलची जबाबदारी आणि मानवी मूल्यांची समज यावरही भर देणार आहे.

सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत एआयशी संबंधित विषय शिकवले जातात. मात्र, आता ही शिकवणी तिसरीपासूनच सुरू झाल्याने भारतातील शिक्षण प्रणाली आणखी आधुनिक, तंत्रज्ञानाभिमुख आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी सक्षम ठरेल.

शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात एक कोटीहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शिक्षकांना एआय शिक्षणासाठी प्रशिक्षण देणे हे मोठं आव्हान आहे. तरीही, मंत्रालयाचा विश्वास आहे की या प्रशिक्षणामुळे भारतातील पुढील पिढी एआय तंत्रज्ञानात निपुण, सर्जनशील आणि भविष्याच्या गरजांसाठी पूर्णपणे सज्ज होईल.

‘महा-TET 2025’ परीक्षा पारदर्शकपद्धतीने पार पाडावी! सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

AI मुळे शिक्षणात होईल फायदा

एआयमुळे शिक्षण अधिक स्मार्ट, वैयक्तिक आणि प्रभावी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार अभ्यासक्रम समजावून सांगणे, चुका ओळखून त्यावर मार्गदर्शन करणे आणि शिक्षकांना अध्यापन सुलभ करणे, या सर्व गोष्टींमध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे शिक्षण अधिक आकर्षक, परिणामकारक आणि भविष्याभिमुख बनेल.

Web Title: Ai will be teach as a subject in school from 3rd stadard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • ai
  • AI Hub

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.