
ANDHRA PRADESH CAPITAL
आपल्या देशातील हिमाचल प्रदेश व्यतिरिक्त, उत्तराखंड आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांना दोन राजधान्या आहेत. हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी शिमला तर हिवाळी राजधानी धर्मशाळा येथे आहे. उत्तराखंडची उन्हाळी राजधानी गैरसैण तर हिवाळी राजधानी डेहराडून आहे. तसेच महाराष्ट्राची उन्हाळी राजधानी मुंबई तर हिवाळी राजधानी नागपूर आहे.
भारताचे एक महत्त्वाचे दक्षिण राज्य असलेल्या आंध्र प्रदेशाने आपली राजधानी चक्क तीन वेळा बदलली आहे. इतकेच नव्हे, तर या राज्याची राजधानी इतिहासातही अनेक वेळा बदलेली आहे.
१९५३ पासून, आंध्र प्रदेशची राजधानी कुर्नुल होती. जी १ ऑक्टोबर १९५३ ते १ नोव्हेंबर १९५६ पर्यंत राज्याची तात्पुरती राजधानी होती. त्या काळात, तिने राज्याची तात्पुरती राजधानी म्हणून काम पाहिले.
कुर्नूलनंतर आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबाद होती. जी २०१४ मध्ये बदलण्यात आली. दोन राज्यांच्या फाळणीनंतर हैदराबादला तेलंगणा राज्याची राजधानी बनवण्यात आली.
हैदराबादला तेलंगणाची राजधानी बनवल्यानंतर आंध्र प्रदेशची एक नवीन राजधानी तयार करण्यात आली. पुर्नरचना कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर, अमरावती २ जून २०२४ पासून आंध्र प्रदेशची राजधानी बनली.