Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE च्या विद्यार्थ्यांनो! दहावीची परीक्षा आता दोन वेळा; २०२६ पासून नवा नियम लागू

CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२६ पासून दोन वेळा बोर्ड परीक्षा घेण्याची नवी पद्धत लागू करणार आहे. NEP 2020 अंतर्गत या निर्णयाचा उद्देश विद्यार्थ्यांवरील ताण कमी करून गुण सुधारण्याची संधी देणे हा आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2026 | 04:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२६ पासून दोन वेळा बोर्ड परीक्षा घेण्याची नवी पद्धत लागू करणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) च्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून, या नव्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे आणि गुण सुधारण्याची संधी देणे हा मुख्य उद्देश आहे. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि शाळांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Career in Music: संगीत क्षेत्रात कसे करावे करिअर? अशा प्रकारे बना Music Producer

दोन परीक्षा कशा असतील?

CBSE दहावीची बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये दोन टप्प्यांत घेणार आहे. पहिली परीक्षा १७ फेब्रुवारी रोजीपासून ते ९ मार्चदरम्यान घेण्यात येईल. तर दुसरी परीक्षा १५ मे ते १ जूनदरम्यान घेण्यात येतील. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन्ही परीक्षा एकाच अभ्यासक्रमावर आधारित असतील. सर्व विद्यार्थ्यांना पहिली बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक असेल. दुसरी परीक्षा ही गुण सुधारण्यासाठीची संधी असेल. विद्यार्थ्यांनी पहिल्या परीक्षेला हलक्यात न घेता गांभीर्याने तयारी करावी, असा सल्ला CBSE ने दिला आहे. दुसरी परीक्षा देणे ऐच्छिक असून, केवळ आपले गुण सुधारायचे असतील तरच विद्यार्थ्यांनी ती द्यावी. अंतिम निकालासाठी दोन्ही परीक्षांपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले असतील, तेच गुण ग्राह्य धरले जातील. पालकांनी अनावश्यक दबाव टाकू नये, अशीही CBSE ची स्पष्ट भूमिका आहे.

नव्या योजनेनुसार, विद्यार्थी जास्तीत जास्त तीन विषयांमध्येच दुसऱ्या परीक्षेत गुणसुधारणा करू शकतील. पहिल्या परीक्षेत दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणीत ठेवण्यात येईल आणि त्यांना दुसऱ्या परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल. मात्र, तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांत नापास झालेले, किंवा जे पहिल्या परीक्षेला अनुपस्थित राहिले, असे विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेस पात्र ठरणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांना थेट २०२७ च्या मुख्य बोर्ड परीक्षेला बसावे लागेल.

Maharashtra Board Exam : उद्यापासून सुरु होणार बारावी बोर्ड परीक्षा; यंदा पहिल्यांदाच असणार ‘ही’ यंत्रणा

क्रीडा क्षेत्रात सहभागी विद्यार्थी तसेच विशेष गरजा असलेले विद्यार्थी (CWSN) यांना पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही परीक्षांमध्ये CBSE च्या विद्यमान नियमांनुसार आवश्यक सवलती दिल्या जाणार आहेत. ही नवी दोन-परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त संधी देणारी असली, तरी अभ्यासाचे योग्य नियोजन करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच, एकाच परीक्षेवर संपूर्ण भवितव्य अवलंबून न राहता सुधारण्याची संधी देणारा हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक मानला जात आहे.

Web Title: Cbse 10th exam new rule of double exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • CBSE
  • CBSE Board Exam

संबंधित बातम्या

Answer Sheet Mismatch:”हे माझे अक्षर नाही आणि मी सोडवलेले प्रश्नही…” १२ वीच्या वेदांतचा सीबीएसईवर धक्कादायक आरोप!
1

Answer Sheet Mismatch:”हे माझे अक्षर नाही आणि मी सोडवलेले प्रश्नही…” १२ वीच्या वेदांतचा सीबीएसईवर धक्कादायक आरोप!

CBSE बोर्डाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी मुदत का वाढवली? जाणून घ्या नवी तारीख!
2

CBSE बोर्डाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी मुदत का वाढवली? जाणून घ्या नवी तारीख!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.