
cbse
निकालांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गुणदानाबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये असणाऱ्या चिंतेला दूर करण्यासाठी बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. अलिकडच्या काळात पेपर तपासणी आणि गुण देण्याच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यामुळे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
यंदा बोर्डाने सीबीएसईच्या उत्तरपत्रिका डिजिटली तपासल्या आहेत. सध्या ऑन स्क्रिन मार्किंगची पद्धत दिल्ली विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठासह देशातील अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये वापरली जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी सुमारे ९८ लाख ६६ हजार उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाठवण्यात आल्या होत्या. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मानवी कारणामुळे होणाऱ्या चुका संपुष्टात आल्या आहेत, असा दावा बोर्डाने केला आहे.
तसेच फिकट शाई किंवा स्कॅनिंगच्या समस्येमुळे स्पष्ट न दिसणाऱ्या सुमारे १३ हजार उत्तरपत्रिका पारंपारिक पद्धतीने तपासण्यात आल्या.
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबद्दल काही शंका किंवा संशय असेल, तर त्यांनी 19 मे 2026 पासून आपल्या गुणपत्रिकांच्या पडताळणी (Verification) आणि पुनर्मूल्यांकनाकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर पुनर्तपासणीत विद्यार्थ्यांचे गुण वाढले तर त्यांची अतिरिक्त फी बोर्डाकडून परत केली जाईल, असे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.