Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राध्यापक भरती निकषात बदल! शिक्षकांची नाराजी घेण्यात आली ध्यानात, ५०:५० सूत्र लागू होण्याची शक्यता

NET/SET उत्तीर्ण उमेदवारांवर अन्याय होणाऱ्या नव्या निकषांविरोधात उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सरकारचे लक्ष वेधले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 05, 2025 | 02:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • उमेदवारांनी या निर्णयाला विरोध दर्शवित सरकारचे लक्ष वेधले
  • अध्यादेशातील वादग्रस्त निकष तात्काळ बदलण्याचे आदेश दिले.
  • ५०:५० सूत्र पुन्हा लागू करण्याची शक्यता उच्चशिक्षण विभागाने व्यक्त केली
प्राध्यापक भरती हा राज्यातील रखडलेल्या मुद्द्यांपैकी एक असलेला मुद्दा आहे. कारण काही दिवसांपूर्वीच उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीचा विषय जाहिर केला होता. पण यातील निकष NET/SET उत्तीर्ण आणि उच्चशिक्षित उमेदवारांना मान्य मुळीच नव्हते. कारण यामुळे ते भरतीमध्ये नियुक्त होण्यापासून वंचित राहत होते. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी प्राध्यापक भरतीसाठी नवीन निकष जाहीर करणारा अध्यादेश प्रसिद्ध केला होता. मात्र या अध्यादेशामुळे अनेक NET/SET उत्तीर्ण आणि उच्चशिक्षित उमेदवार भरतीपासून वंचित राहतील, अशी गंभीर शक्यता निर्माण झाली. परिणामी शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली. विविध विद्यापीठातील प्राध्यापक संघटना, संशोधक आणि उमेदवारांनी या निर्णयाला विरोध दर्शवित सरकारचे लक्ष वेधले.

संदेश विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचे ५० प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू

या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा केली. भरती प्रक्रियेतील वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातील समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी अध्यादेशातील वादग्रस्त निकष तात्काळ बदलण्याचे आदेश दिले. सध्या सुधारित अध्यादेशाला अंतिम रूप देऊन तो मंजुरीसाठी राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नव्या अध्यादेशात काही तरतुदी अशा होत्या, ज्यामुळे NET/SET उत्तीर्ण उमेदवारांना प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता गुण कमी पडण्याची शक्यता होती. राज्यातील उमेदवारांना मागे टाकत परराज्यातील उमेदवार अधिक प्रमाणात पात्र ठरतात, अशी भीती निर्माण झाली. विशेषतः, काही विषयांमध्ये पात्र उमेदवारच उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे अनेक तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले.

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

५०:५० सूत्र परत येण्याची चिन्हे

प्राध्यापक भरतीसाठी लागू असलेले नवीन ७५:२५ गुणांकन सूत्र (शैक्षणिक पात्रता – ७५ गुण, मुलाखत – २५ गुण) अनेक उमेदवारांना अडचणीत आणणारे ठरले. या सूत्रामुळे NET/SET उत्तीर्ण उमेदवारांना अपेक्षित गुण मिळण्यात अडथळे येत होते. त्यामुळे यावर पर्याय म्हणून पूर्वी लागू असलेले ५०:५० सूत्र पुन्हा लागू करण्याची शक्यता उच्चशिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. हे सूत्र लागू झाल्यास राज्यातील उमेदवारांना अधिक संधी मिळेल आणि गुणवत्ता व अनुभव या दोन्ही घटकांना संतुलित महत्त्व मिळू शकते.

Web Title: Changes in professor recruitment criteria 5050 formula is going to be implemented

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Career
  • Professor Jobs

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन
1

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन

संदेश विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचे ५० प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू
2

संदेश विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचे ५० प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू

Chandrapur News: महागाई वाढली, पण शिष्यवृत्तीचं काय? कमी रकमेमुळे विद्यार्थ्यांना करावी लागतेय तारेवरची कसरत
3

Chandrapur News: महागाई वाढली, पण शिष्यवृत्तीचं काय? कमी रकमेमुळे विद्यार्थ्यांना करावी लागतेय तारेवरची कसरत

दिल्ली-केंद्रशासित प्रदेशतर्फे 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू!
4

दिल्ली-केंद्रशासित प्रदेशतर्फे 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.