Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभियांत्रिकी क्षेत्रात डिप्लोमा उमेदवारांना मोठा त्रास! पदवी शिक्षणात प्रवेश घेताना अडचणीचा सामना

डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रमातील आरक्षण २०% वरून १०% करण्यात आल्यानं विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी आहे. ही संख्या पुन्हा वाढवावी, अशी त्यांची मागणी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 18, 2025 | 02:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न अनेक जणं पाहतात. ते सत्यात उतरवण्यास अनेक विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून येतात आणि डिप्लोमाचे शिक्षण घेतात. डिप्लोमा घेऊनही पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतात. पण या टप्प्यात येताच विद्यार्थ्यांची नाचक्की सुरु होते, कारण राज्यात अभियांत्रिकी क्षेत्रात डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांना पदवीचे शिक्षण घेण्यासाठी फार जागा शिल्लक नसते. मुळात, त्यांच्यासाठी केवळ १०% जागा राखीव आहे, जी संख्या घट केलेली आहे.

एस टी महामंडळात सुवर्ण भरती! प्रशिक्षणासाठी उमेदवारांना करता येणार अर्ज; जाणून घ्या भरती प्रक्रिया

आधी, डिप्लोमा उमेदवारांना पदवी शिक्षणात येण्यासाठी २०% जागा शिल्लक होती. ज्यात ५०% घट करून, ती संख्या १०% आणली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकवर्ग नाराज आहेत. त्यांच्याकडून ही संख्या पुन्हा २०% वर करण्यात यावी, अशी मागणी गेले अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यांच्या मते, सरकारच्या या निर्णयामुळे, विद्यार्थ्यांच्या करिअरवर प्रभाव पडत आहे. इच्छा असूनही मुलांना शिकता येत नाही आहे. मन मारून त्यांना सिव्हिल किंवा मॅकेनिकल क्षेत्रात जावे लागत आहे. सरकार या बाबींचा विचार करून सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा विद्यार्थी तसेच पालकांनी दर्शवली आहे.

पदविका शिक्षणात अगदी ७५% ते ८५% गुण असणाऱ्या उमेदवारांनाही पदवी शिक्षणात प्रवेश घेताना अडचणी येत आहेत. केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रकल्पांची उमेद नागरिकांच्या मनात तयार करत आहे. आणि अशावेळी तंत्रज्ञान शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यामध्ये नाचक्की होत आहे, हे अतिशय दुर्दैवी असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. तज्ज्ञांच्या मते, पदविका शिक्षण घेणारा उमेदवार पदवी अभ्यासक्रमात थेट दुसऱ्या वर्षी जातो. अशामध्ये बदल झाल्यामुळे त्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

करिअर घडवण्याची उत्तम साथ! ‘My Career Advisor App’ करा डाउनलोड, नका घेऊ करिअरचा लोड

जागांमध्ये करण्यात आलेली घट पुन्हा २०% करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी केली आहे. यावर कधी निर्णय घेण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Engineering students facing difficulties while getting admission in graduate education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • education news marathi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.