
फोटो सौजन्य - Social Media
प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच
या यशाबद्दल बोलताना नंद घरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशी अरोरा यांनी सांगितले की, भारताच्या भविष्यातील प्रगती ही मुलांच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून आहे. प्रत्येक नवीन नंद घर हे दर्जेदार पोषण, शिक्षण आणि आरोग्य सेवा मुलांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकार, स्थानिक प्रशासन आणि समाजाच्या सहकार्याने अधिक सक्षम भारत घडवण्याचा संकल्प या उपक्रमातून अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक नंद घर हे आधुनिक आणि तंत्रज्ञान-सज्ज अंगणवाडी केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. येथे बालशिक्षण, पोषण, प्राथमिक आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अशा विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. हा उपक्रम केंद्र सरकारच्या ‘सक्षम अंगणवाडी’ आणि ‘पोषण 2.0’ अभियानाशी सुसंगत असून, बालविकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना देतो.
PF की म्युच्युअल फंड? निवृत्तीच्या पैशांसाठी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर? EPFO ने केला खुलासा
उत्तर प्रदेशातील खोजवा येथील अंगणवाडी सेविका अंजू दुबे यांच्या कार्यातून या उपक्रमाचा प्रभाव दिसून येतो. संवादात्मक शिक्षण, वैयक्तिक मार्गदर्शन आणि समुदायाच्या सहभागातून त्यांनी केंद्राचे प्रभावी शिक्षण केंद्रात रूपांतर केले. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून पालकांचाही सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे. सध्या 15,000 केंद्रे कार्यरत झाल्यानंतर ग्रामीण भारतातील अधिकाधिक महिला आणि बालकांपर्यंत पोषण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि उपजीविकेच्या संधी पोहोचवण्याचा वेदांताचा ‘नंद घर’ उपक्रम अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.