Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकारणी होण्यासाठी शिक्षित असणे किती महत्त्वाचे? खरंच शिक्षण गरजेचं आहे का? जाणून घ्या

लोकशाहीत राजकारण हे समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम असून, राजकारणी होण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे का हा प्रश्न कायम चर्चेत राहिला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 29, 2026 | 05:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

लोकशाही व्यवस्थेत राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अनेकदा प्रश्न उपस्थित होतो की, राजकारणी होण्यासाठी शिक्षित असणं खरंच गरजेचं आहे का? आजवरचा राजकीय इतिहास पाहिला तर उत्तर थोडंसं मिश्र आहे. पूर्वीच्या काळात राजकारणात शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. समाजातील प्रश्न, लोकांच्या अडचणी आणि जमिनीवरचं वास्तव समजणारा माणूस नेता होऊ शकत होता. त्यामुळे शिक्षित असो वा अशिक्षित, दोघांनाही राजकारणात संधी मिळत होती. मात्र, काळ बदलला आहे. आज राजकारण ही केवळ सभा, भाषण आणि आंदोलनांपुरती मर्यादित गोष्ट राहिलेली नाही, तर धोरणे, कायदे, अर्थकारण, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्याशी थेट जोडलेली आहे.

मुलींना ‘राष्ट्रप्रेम अभियान’ अंतर्गत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण! राज्यातील २१ हजारांहून अधिक शाळांमध्ये उपक्रम

आजच्या स्पर्धात्मक युगात जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाला महत्त्व आले आहे. नागरिक, कार्यकर्ते, अधिकारी हे सर्वच मोठ्या प्रमाणात शिक्षित झाले आहेत. अशा परिस्थितीत जर नेता अशिक्षित किंवा कमी शिक्षित असेल, तर “सगळे शिक्षित आणि नेता अडाणी” हे समीकरण अनेकांना खटकते. त्यामुळे आधुनिक काळात राजकारणात शिक्षणाचे महत्त्व नक्कीच वाढले आहे.

अशिक्षित किंवा कमी शिक्षण असूनही उंचशिखर गाठलेले महाराष्ट्रातील लोकनेते

महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते होऊन गेले, ज्यांचे औपचारिक शिक्षण मर्यादित होते, पण अनुभव, नेतृत्वगुण आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी मोठी उंची गाठली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिक्षण दहावीपर्यंतच होते. मात्र त्यांची भाषाशैली, विचारांची धार आणि जनमानसावर असलेला प्रभाव आजही आदर्श मानला जातो. तसेच अजित पवार यांचे शिक्षणही मर्यादित असले, तरी प्रशासनावर पकड, निर्णयक्षमता आणि राजकीय अनुभवामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. केवळ दहावी किंवा बारावी शिक्षण असतानाही काही नेत्यांनी राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अशा नेत्यांनी लोकांच्या प्रश्नांशी थेट नातं जोडलं, जमिनीवर काम केलं आणि अनुभवातून शिकत स्वतःला घडवलं. हे उदाहरण दाखवतात की शिक्षण कमी असलं तरी राजकारणात यश अशक्य नाही.

Ajit Pawar Death News: राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व शाळा राहतील बंद

उच्चशिक्षित लोकनेते

दुसरीकडे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, आर. आर. पाटील यांसारखे उच्चशिक्षित नेतेही महाराष्ट्राने पाहिले आहेत. कायदा, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यशास्त्र यांसारख्या विषयांचं ज्ञान त्यांच्या निर्णयांमध्ये आणि धोरणांमध्ये स्पष्टपणे दिसून येतं. आधुनिक प्रशासन, कायदे आणि जागतिक स्तरावरील आव्हानं समजून घेण्यासाठी हे शिक्षण उपयुक्त ठरतं.

शिक्षण हे राजकारणात यशाचं एकमेव सूत्र नाही, पण आजच्या काळात ते दुर्लक्षितही करता येणार नाही. अनुभव, नेतृत्व, लोकांशी नातं आणि नैतिकता यासोबत शिक्षणाची जोड मिळाली, तर तो नेता अधिक प्रभावी ठरतो. म्हणूनच आजच्या राजकारणात शिक्षण आवश्यक नसले तरी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Web Title: How much education is important for be politician

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Career
  • education

संबंधित बातम्या

कमी शिकलात तरी अडचण नाही! अगदी 8वी पास करू शकतात अर्ज, लक्षात असू द्या
1

कमी शिकलात तरी अडचण नाही! अगदी 8वी पास करू शकतात अर्ज, लक्षात असू द्या

मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई! मराठीचा समावेश न केल्यास मान्यता रद्द- मंत्री भूसे
2

मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई! मराठीचा समावेश न केल्यास मान्यता रद्द- मंत्री भूसे

CBSE चा नवा नियम! कॉपी कराल तर पास होणे अशक्यच; विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा निर्णय
3

CBSE चा नवा नियम! कॉपी कराल तर पास होणे अशक्यच; विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा निर्णय

राज्यातील हजारो तरुणांना मिळणार रोजगार! 21 वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला गती
4

राज्यातील हजारो तरुणांना मिळणार रोजगार! 21 वर्षानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.