Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बससेवा होणार अधिक जबाबदार, मिळणार तात्काळ मदत

बस सेवा रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना काही गोष्टी भोगावे लागत आहेत. त्या गोष्टी टाळण्यासाठी ST महामंडळाने हेल्पलाईन सुविधेला सुरुवात केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 23, 2025 | 02:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी बस प्रवासादरम्यान भेडसावणाऱ्या समस्यांची गंभीर दखल घेत, परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळ लवकरच विशेष हेल्पलाइन सुरू करणार असून, शालेय बस फेऱ्यांचे योग्य नियोजन न करणाऱ्या आगार व्यवस्थापकांवर कठोर कारवाई करण्याची तयारीही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दर्शवली आहे. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला दिलेल्या भेटीत त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या

या भेटीदरम्यान अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष मंत्र्यांसमोर शालेय बस व्यवस्थापनातील विविध त्रुटी मांडल्या. काही विद्यार्थ्यांनी एसटी बस वेळेवर सुटत नसल्याची तक्रार केली, तर अनेकांनी बसमध्ये गर्दी वाढल्यामुळे चालक-वाहक थांब्यावर थांबत नसल्याचा आरोप केला. बस उशिरा येणे, अचानक रद्द होणे आणि त्यातून निर्माण होणारे शैक्षणिक नुकसान यावरही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. काही ग्रामीण आणि आदिवासी भागांत विद्यार्थ्यांसाठीच असलेली ‘मानव विकास बस’ इतर कारणांसाठी वापरली जात असल्याचेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले, ज्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांनाच प्रवासाची गैरसोय होते.

विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की शाळा किंवा महाविद्यालय सुटल्यानंतर एका तासाच्या आत घरी पोहोचणे अपेक्षित असते. मात्र बस सेवेत होत असलेल्या अडचणींमुळे घरी जाण्यास प्रचंड विलंब होतो. यामुळे पालकांचा ओरडा सहन करावा लागतो आणि काही वेळा गैरसमजातून विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षा देखील मिळते. अशाच वाढत्या ताणतणावामुळे काही विद्यार्थिनींनी आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय घेतल्याच्या घटना समोर आल्या असून, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

शालेय वेळेत विद्यार्थ्यांना बस सेवा वेळेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित आगारांवर आहे. त्यामुळे त्यात झालेल्या त्रुटींसाठी थेट आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक अधिकारी जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे जितके दिवस नुकसान झाले आहे, त्या प्रत्येक दिवसाची स्वतंत्र नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा सक्तीची रजा देण्यापर्यंतची कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शालेय बस सेवेत सुधारणा करण्याची गरज अधिक तातडीची बनली आहे.

शालेय विद्यार्थी–विद्यार्थिनींसाठी एसटीची ‘हेल्पलाईन’ सुरू होणार; बस विलंब, रद्दीकरणावर तत्काळ मदत

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि तात्काळ मदतीसाठी एसटी महामंडळ लवकरच विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करणार आहे. राज्यातील सर्व ३१ विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याने, प्राचार्यांनी किंवा मुख्याध्यापकांनी या क्रमांकावर थेट संपर्क साधून तक्रार नोंदवता येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना तत्काळ मदत मिळावी आणि बससेवा अधिक जबाबदारीने चालवली जावी, यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आणि सोयीला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी सेवा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: Now st service will be more responsible immediate help will be provided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • st
  • st bus

संबंधित बातम्या

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान
1

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान

ST Employees Salary : ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा
2

ST Employees Salary : ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा

‘लालपरी’ची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3

‘लालपरी’ची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.