
फोटो सौजन्य - Social Media
उपक्रम सुरू करण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर घेतलेल्या मूल्यमापन चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या जाहिरात-साक्षरतेत मोठी सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांमध्ये जाहिरातींचा उद्देश ओळखण्याची क्षमता ४३ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांपर्यंत वाढली. तसेच जाहिरातींमधील दावे तपासून पाहण्याची सवय, जाहिरातींमागील मन वळवण्याचे तंत्र आणि जाहिरात व मूळ कंटेंट यातील फरक समजण्याची क्षमता देखील लक्षणीय वाढली.
इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांमध्येही सकारात्मक बदल दिसून आले. इन्फ्लुएन्सर प्रमोशन्स समजून घेणे, ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि जाहिरातींच्या उद्देशाचे आकलन यामध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि आसामी अशा आठ भाषांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. परस्परसंवादी वर्ग सत्रे, व्हिडिओ, उपक्रम आणि चर्चांद्वारे विद्यार्थ्यांना जाहिराती ओळखणे आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमाबद्दल बोलताना एएससीआयच्या सीईओ आणि सेक्रेटरी जनरल Manisha Kapoor म्हणाल्या, “आजच्या डिजिटल युगात जाहिरात आणि कंटेंट यामधील सीमारेषा धूसर होत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये जाहिरात साक्षरता विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जागरूकतेत दुपटीने वाढ झाल्याचे समाधान आहे.” एएससीआयने भविष्यातही शाळांमध्ये जाहिरात-साक्षरतेचा प्रसार सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.