Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘परीक्षा पे चर्चा’ : नोंदणीत अनुत्साह! टार्गेट ६५ लाख असतानाही प्रत्यक्षात ३ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

‘परीक्षा पे चर्चा २०२६’साठी महाराष्ट्राला ६५ लाख नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले असले, तरी आतापर्यंत केवळ सुमारे तीन लाख नोंदणीच पूर्ण झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 26, 2025 | 03:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • तब्बल ६२ लाखांहून अधिक नोंदणी पूर्ण करण्याचे दडपण
  • महाराष्ट्रासाठी ६५ लाख नोंदणीचे उद्दिष्ट
  • लाखो नोंदणी कमी कालावधीत कशा पूर्ण करायच्या, हा मोठा प्रश्न
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘परीक्षा पे चर्चा २०२६’ या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याला तब्बल ६५ लाख विद्यार्थी, शिक्षक व पालकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ सुमारे तीन लाखांहून कमी जणांचीच नोंदणी झाली असल्याने शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उर्वरित केवळ १६ ते २० दिवसांत तब्बल ६२ लाखांहून अधिक नोंदणी पूर्ण करण्याचे दडपण आता थेट शिक्षकांवर आले आहे.

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी! उच्च व तंत्रशिक्षणात परिवर्तनशील उपक्रम

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘परीक्षा पे चर्चा २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात नोंदणी अपेक्षित आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रासाठी ६५ लाख नोंदणीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. मात्र सध्या केवळ २ लाख ७८ हजार ५३५ विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचीच नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित लाखो नोंदणी कमी कालावधीत कशा पूर्ण करायच्या, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्र शासनाच्या ‘परीक्षा पे चर्चा ९’ या उपक्रमांतर्गत १ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. सहावी ते बारावी इयत्तेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना अधिकृत संकेतस्थळ https://innovateindia.mygov.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीतून निवडक विद्यार्थी व पालकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधून उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी थेट जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांमार्फत शाळा स्तरावर नोंदणी वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात शाळांमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, परीक्षा जवळ आल्याने शिक्षक मोठ्या अडचणीत सापडल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. सध्या अभ्यासक्रम पूर्ण करणे, अंतर्गत मूल्यमापन, सराव परीक्षा, दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांची तयारी अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या शिक्षकांवर आहेत. अशा परिस्थितीत सातत्याने ऑनलाईन नोंदणी करणे, अहवाल भरणे आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्यात उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असली, तरी ऐन परीक्षा तोंडावर असताना या उपक्रमासाठी जबरदस्तीने नोंदणी करण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही शिक्षक संघटनांकडून केला जात आहे. यामुळे शिक्षणाच्या मूळ उद्देशावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

नीट, जेईई परीक्षांसाठी फेस रिकग्निशन! इतर परीक्षांमध्येही ‘ही’ व्यवस्था जाणार राबवली

एकीकडे केंद्र सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’सारखा उपक्रम राबवत असताना, दुसरीकडे उद्दिष्टपूर्तीसाठी घाई आणि दबाव निर्माण केल्याने नोंदणीत अनुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत नोंदणी कशी वाढवली जाणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pariksha pe charcha lack of enthusiasm in registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • education
  • Exam

संबंधित बातम्या

धाराशिव जिल्ह्यातील 7 शाळांचा सन्मान! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत झाली निवड
1

धाराशिव जिल्ह्यातील 7 शाळांचा सन्मान! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत झाली निवड

परीक्षेत Dhurandhar, आदित्य धरच्या चित्रपटातील पात्रे अकाउंट्सच्या पेपरात, विद्यार्थ्यांना विचारले पात्रांवर आधारित प्रश्न
2

परीक्षेत Dhurandhar, आदित्य धरच्या चित्रपटातील पात्रे अकाउंट्सच्या पेपरात, विद्यार्थ्यांना विचारले पात्रांवर आधारित प्रश्न

शाळा आपल्या दारी! मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम
3

शाळा आपल्या दारी! मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम

Art शाखेतही बक्कळ पैसा! 12 वी नंतर फक्त UPSC च नाही तर ‘हे’ आहे 5 हाय-पेइंग करिअर पर्याय, जाणून घ्या सविस्तर
4

Art शाखेतही बक्कळ पैसा! 12 वी नंतर फक्त UPSC च नाही तर ‘हे’ आहे 5 हाय-पेइंग करिअर पर्याय, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.