Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेतील मध्यान्ह भोजनातून तब्बल 12 विद्यार्थ्यांना विषबाधा; पालकांमध्ये तीव्र संताप

राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य उद्देश वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे, शाळांतील नोंदणी व उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र, याच योजनेतील अन्न मुलांच्या जीवाला धोका ठरत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 28, 2026 | 01:53 PM
मध्यान्ह भोजनातून १२ विद्यार्थ्यांना विषबाधा

मध्यान्ह भोजनातून १२ विद्यार्थ्यांना विषबाधा

Follow Us
Close
Follow Us:

अंजनगाव सुर्जी : सीताबाई संगई शाळेत मध्यान्ह भोजनात देण्यात आलेली खिचडी खाल्ल्याने तब्बल १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.२४) उघडकीस आली. या प्रकरणी एका पालकाने मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून करार रद्द करण्याची मागणी केली आहे.

राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य उद्देश वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे, शाळांतील नोंदणी व उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र, याच योजनेतील अन्न मुलांच्या जीवाला धोका ठरत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या योजनेंतर्गत अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख करण्याची जबाबदारी पंचायत समितीतील पोषण अधीक्षकांकडे असते. मात्र, या प्रकरणात पोषण अधीक्षकांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करत कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे.

हेदेखील वाचा : Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र पोरका, तिरंगा अर्ध्यावर! उपमुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी काय आहे प्रोटोकॉल? जाणून घ्या नियम

दरम्यान, मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की, खिचडी पुरवठा करणारा कंत्राटदार व शालेय पोषण अधीक्षक हे या प्रकरणास जबाबदार आहेत. शहरातील काही शाळांना खिचडी शिजवण्याचे व पुरवण्याचे कंत्राट ‘नुरैल’ नावाच्या बचतगटाला देण्यात आले असून, त्यांचे स्वयंपाकघर सुर्जी परिसरात आहे. स्वयंपाकघर अन्न व औषध प्रशासनाचा परवाना व सूचना फलक नसतानाही चालवले जात असल्याचा आरोप आहे.

किचन करण्यात आले स्वच्छ

या घटनेनंतर दोष लपवण्यासाठी स्वयंपाकघर तत्काळ स्वच्छ करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तरीही पोषण अधीक्षक शीला आठवले कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून होत आहे.

ओडिशातही विषबाधेची घटना

दुसरीकडे, ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील इटाप गावात संशयास्पद अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. चिकन करी आणि पालक खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तिघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण अन्नातून विषबाधा असल्याचे मानले जात आहे आणि चौकशी सुरू आहे.

Web Title: 12 students poisoned after eating mid day meal at school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Amravati News
  • Food Poison

संबंधित बातम्या

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित
1

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.