Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: यमुना एक्स्प्रेस वेवर धुक्यामुळे भीषण साखळी अपघात; वाहनांना आग लागून 13 जणांचा होरपळून मृत्यू,43 जखमी

पहाटेच्या दाट धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेस वेवर अनेक बस व कारची साखळी धडक झाली. वाहनांना आग लागून 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 43 जण जखमी झाले. मृतांची ओळख डीएनए तपासणीतून पटवली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 17, 2025 | 12:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • आग्रा–नोएडा पट्ट्यात धुक्यामुळे दृश्यमानता कमी
  • 8 बस व 3 कार एकमेकांवर धडकून आग
  • 13 मृत, 43 जखमी; चौकशी समिती स्थापन
मथुरा: यमुना एक्स्प्रेस वेवर एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेस वेवर अनेक वाहन एकमेकांवर धडकल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात आग पसरून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४३ जण जखमी झाले आहेत. या अपघातात आठ बस आणि तीन वाहने एकमेकांना धडकली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात पहाटेच्या वेळी दाट धुक्यांमुळे झाला.

तिच्या गळ्यात काचेचा तुकडा घुसला तरीही…

या अपघातात पार्वती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. अपघातात तिच्या गळ्यात काचेचा तुकडा घुसला होता. बसने पेट घेतल्याचे समजताच तिने आपल्या दोन मुलांना खिडकी बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मात्र तिचा रक्तस्त्राव जास्त झाल्याने तिचा जीव वाचू शकला नाही. तिचा दीर गुलझारी याने रुग्णालयामध्ये तिचा शोध घेतला तेव्हा तीचा कुठेही शोध लागला नाही.

पार्वती आपल्या पतीला भेटण्यास जात होती

पार्वती देवी तिच्या दोन मुलांसह उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील तिच्या गावी नोएडाला तिचा पती गोविंदला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी अपघातात तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलिसांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, १३ जणांचे या अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे. बहुतेक मृतदेह ओळखण्यापलीकडे आहेत. आगीत जळालेले अवशेष गोळा करून शवविच्छेदनासाठी काळ्या पिशव्यांमधून रुग्णालयात नेण्यात आले आहे. जळालेल्या मृतदेहांचे डीएनए तपासणी करून नातेवाइकांनी दिलेल्या माहितीशी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

यमुनानगर एक्स्प्रेस वेवरील अपघाताची घटना ही बलदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनास्थळी केवळ जळलेल्या बसगाड्या आणि कारचे सांगाडे उरले होते. ते रस्त्यावरून हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्या. ‘यमुना एक्स्प्रेस वेच्या आग्रा ते नोएडा पट्ट्यात धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक वाहनांची धडक झाली. यातील काही वाहनांनी पेट घेतला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’, असे मथुरेचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितले.

मृतांपैकी तिघांची ओळख पटली असून, अखिलेंद्र प्रताप यादव (४४, प्रयागराज), रामपाल (७५, महाराजगंज) आणि सुलतान अहमद (६२, गोंडा) अशी त्यांची नावे आहेत. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी या अपघाताच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी (प्रशासन) अमरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बलदेव पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्यनाथ यांनी केले ट्विट

तर या अपघाताबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सोशल मिडीया ‘एक्स’वरून अपघातातील मृतांच्या नातेवाइकांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कशामुळे झाला?

    Ans: पहाटेच्या दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली.

  • Que: या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: एकूण 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

  • Que: सरकारकडून काय मदत जाहीर झाली?

    Ans: मृतांच्या नातेवाइकांना 2 लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत.

Web Title: Accident a horrific chain collision due to fog on the yamuna expressway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • Accident
  • crime

संबंधित बातम्या

Palghar News: ग्रामपंचायतच्या ना-हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची मागणी, ग्रामविकास अधिकाऱ्याला ACB कडून  रंगेहात अटक
1

Palghar News: ग्रामपंचायतच्या ना-हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची मागणी, ग्रामविकास अधिकाऱ्याला ACB कडून रंगेहात अटक

Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
2

Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

Punjab Crime: साखरपुड्याची कबुली महागात! संतप्त प्रेयसीने थेट गुप्तांगावर केला हल्ला, आणि प्रियकराने…
3

Punjab Crime: साखरपुड्याची कबुली महागात! संतप्त प्रेयसीने थेट गुप्तांगावर केला हल्ला, आणि प्रियकराने…

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये निवडणूकपूर्व तणाव, भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार
4

Ambernath Crime: अंबरनाथमध्ये निवडणूकपूर्व तणाव, भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.