
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
११ फेब्रुवारी,बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास छत्रपती नगर परिसरात घडली आहे. भारत विद्यालयात आठवीत शिकणारा नमन अरुण राऊत हा विध्यार्थी घरी एकटाच होता. त्याचे आई आणि वडील दोघेही पेशाने शिक्षक आहे. ते आपल्या कर्तव्यावर बाहेरगावी गेले होते. दरम्यान, नमनने राहत्या घरातील अभ्यास करण्याच्या खोलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Ulhasnagar Crime: उल्हासनगरात सावकाराची गुंडागर्दी; तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष छळ
वर्गमित्राने देखील आत्महत्या केली
14 फेब्रुवारी, शनिवारी सायंकाळी ५ वाजता नमनच्या वर्गमित्राने देखील टोकाचे पाऊल उचलले आहे. अथर्व वैभव राणे असे आत्महत्या करण्याऱ्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. अर्थव हा सुंदरखेड परिसरात राहत होता. त्याचे वडील कारागृह पोलीस म्हणून कार्यरत आहेत. शाळेतून घरी परतल्यानंतर अर्थवणे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपला आयुष्य संपवला.
या दोन्ही घटनेने बुलढाणा शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र या दोन्ही १४ वर्ष्याच्या मुलाने आपले आयुष्य का संपवले याचे कारण अद्याप समजू शकले नाही आहे. पोलीस आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी सगळ्या दिशेने तपास करत आहेत. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्यावर असलेल्या दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे एका तरुण शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध पियुन टोकाचा पाऊल उचलल्याचे समोर आले. या घटनेत ३४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाली तर पत्नी थोडक्यात बचावली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरु आहेत.
दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं
Ans: दोघेही अवघे 14 वर्षांचे होते आणि आठवीत शिकत होते.
Ans: नाही, अद्याप नेमके कारण स्पष्ट झालेले नाही; पोलिस तपास करत आहेत.
Ans: पालकवर्ग आणि शिक्षणक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.