
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
निखिल वाघमारे आणि अल्पवयीन मुलगा हे दोघे जवळचे मित्र होते. एकमेकांच्या घरी ये- जा सुरू होते. अशातच निखिलने मित्राच्या आईच्या मोबाईलवर मेसेज केला. संबंधित मेसेज पाहून त्या महिलेचा मुलगा संतापला. संतापाच्या भरात त्याने निखिलवर जीवघेणा हल्ला केला. रात्री अंधाराचा फायदा घेत शिरसवाडी भागात शेतातील घरासमोर निखिल झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तेव्हा, त्या मुलाने निखिल झोपला असताना चाकूने वार करत संपवलं.
या घटनेची माहिती तालुका जालना पोलिसांना समजताच पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान हल्लेखोर मुलाने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ‘मित्राने आईला मेसेज केला म्हणून मी त्याची हत्या केली’, असे त्याने सांगितले. सदर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, या प्रकरणाची पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाणे निरीक्षर पोलीस संतोष साबळे यांनी दिली. शिरसवाडीतील या घडलेल्या घटनेनं जालना जिल्हा हादरून गेल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लग्नाचे आमिष, अत्याचार आणि चार महिन्यांची गर्भवती; शिक्षा टाळण्यासाठी आरोपीने काय केलं बघा…
जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणी चार महिन्यांची गर्भवर्ती राहिल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केले मात्र आरोपीने शिक्षा टाळण्यासाठी जे केले ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. ही घटना बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Andhra Pradesh: लग्नाला नकार दिल्याचा संताप; 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा थेट चिरला गळा
Ans: आईला मेसेज केल्याच्या रागातून हत्या करण्यात आली.
Ans: निखिल झोपेत असताना आरोपीने धारदार शस्त्राने वार केले.
Ans: अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.