Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: नवी मुंबईतील विविध ठिकाणी बंद सीसीटीव्ही कॅमेरे; पोलीस तपासावर परिणाम

शेकडो कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या हेतूने हे कॅमेरे लावण्यात आले आहेत तो हेतू सध्य होत नसल्याचं दिसून येत आहे. पोलिसांच्या गुन्हे तपास कामात या सीसीटीव्ही फुटेजचा मोठा आधार असतो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2025 | 03:06 PM
नवी मुंबईतील विविध ठिकाणी बंद सीसीटीव्ही कॅमेरे; पोलीस तपासावर परिणाम

नवी मुंबईतील विविध ठिकाणी बंद सीसीटीव्ही कॅमेरे; पोलीस तपासावर परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात तब्बल १४०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र त्यातील सुमारे ८०० कॅमेरेच सध्या कार्यरत आहेत. उर्वरित शेकडो कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या हेतूने हे कॅमेरे लावण्यात आले आहेत तो हेतू सध्य होत नसल्याचं दिसून येत आहे.

फिरायला जाण एकला जीवावर बेतल; डॅममध्ये पोहायला गेलेल्यापैकी एकाचा बुडून मृत्य…

पोलिसांच्या गुन्हे तपास कामात या सीसीटीव्ही फुटेजचा मोठा आधार असतो. गुन्ह्याच्या ठिकाणी किंवा त्या परिसरातील कॅमेऱ्यात आरोपींच्या हालचाली कैद झालेल्या असतात. तसेच आरोपीची तंतोतंत ओळख पटवण्यासाठी हे कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतात. मात्र शहरातील अनेक कॅमेरे बंद स्थितीत असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे तपासासाठी दिवस रात्र मेहनत घेऊनदेखील कधी पुरावे मिळत नाहीत. तर पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की महापालिकेने इतका मोठा खर्च करून लावलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे जर वेळच्या वेळी देखभाल न झाल्याने बंद राहत असतील, तर त्याचा नागरिकांच्या सुरक्षेसाठी व गुन्ह्याच्या तपासासाठी याचा नेमका काय उपयोग? त्यामुळे अनेक वेळा पोलिसांना आरोपिंपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना उशीर होतो. अनेकदा आरोपीची ओळख लवकर पटली तर आरोपी पर्यंत पोलीस लवकर पोहोचतात. मात्र उशिरा पटलेल्या ओळखीमुळे आरोपी राज्य सोडून गेल्यावर पोलिसांना ससेहेलपट करावी लागते. त्यामुळे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद असलेले कॅमेरे तात्काळ सुरु करण्याची मागणी होत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने शासन प्रशासनातर्फे कॅमेरे लावले जातात. मात्र पोलीस प्रशासनाचाच या कॅमेराला विरोधात आहे. आणि यात पोलिसांचा फायदा आहे. मी बघितले नवी मुंबई पोलिसांची प्रतिमा हप्ता घेण्याबाबतीत मलीन आहे. तसेच ग्रेड १ च्या गुन्ह्यांचा त्यांचा सक्सेस रेट चांगला आहे, बाकी इतर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सक्सेस रेट चांगला नाही, अशी माहिती कॉन्सचिऊस सिटीझन फॉरमचे के कुमार यांनी दिली.

सुरक्षेच्या दृष्टीने हा खूप गंभीर विषय आहे. हे कॅमेरे लावताना पालिका प्रशासनाने पोलिसांशी समन्वय साधून महत्त्वाच्या, तसेच मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे लावले पाहिजेत. तसेच त्यावर सेंट्रल लाईन मॉनिटरिंग सिस्टम पाहिजे. तसेच पालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्या देखरेखी खाली कॉर्डीनेशन टीम देखील पाहिजे, अशी प्रतिक्रिया ह्यूमन चेन संयोजक बी एन कुमार यांनी दिली.

आत्ताच्या घडीला फक्त करायचं म्हणून केले जातं, नंतर त्याच्या दुरुस्ती व देखभाल कोणी करत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही लावण्यामागचा उद्देश्य साध्य होत नाही. आणि नागरिकांच्या पैशाचा चुरडा होतो. तसेच कॅमेरे लावताना हायटेक लावावे जेणेकरून काही तांत्रिक बिघाड झाल्यास संबंधित पोलिस अथवा पालिका प्रशासनाला याची सूचना मिळेल,अशी माहिती आरटीआय कार्यकर्ता राजीव मिश्रा यांनी दिली.

पालिका ही जनतेने भरलेल्या करा मधून पैसा खर्च करते, पण जर त्या कॅमेऱ्यांचा नागरिकांना फायदा होत नसेल तर त्या सुविधेचा नेमका काय हेतू आहे. पालिकेने कोणाला खुश करण्यासाठी कॅमेरे लावलेत का?, पण नागरिक व पोलिसांना या कॅमेराचा फायदा होत नसेल तर, पालिकेने ही मोहीम राबवायला नको, जेणेकरून नागरिक नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, अशी तरीही आरटीआय कार्यकर्ता संचु मेनन यांनी दिली.  समाजातील गुन्हे रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने दुरुस्ती देखभाल करण्याच्या कंपनीला सांगून, लवकरात लवकर कॅमेरे सुरू करून देण्याची मागणी करावी,अशी मागणी आरटीआय कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी केली आहे.

Solapur Crime:तेरा महिन्याच्या बाळाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्य; मात्र मामाच्या संशयाने बॉडी उकरुन काढली आणि….

Web Title: Various places in navi mumbai have closed cctv camera impact on police investigations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • CCTV
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

नवी मुंबईत रंगणार महाराष्ट्रातील पहिली फ्रँचायझी बॅडमिंटन सुपर लीग; १० लाखांचे बक्षीस
1

नवी मुंबईत रंगणार महाराष्ट्रातील पहिली फ्रँचायझी बॅडमिंटन सुपर लीग; १० लाखांचे बक्षीस

नवी मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा,ऐरोलीत लवकरच अँजिओग्राफी सेवा सुरू,आयुक्तांची पाहणी
2

नवी मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा,ऐरोलीत लवकरच अँजिओग्राफी सेवा सुरू,आयुक्तांची पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.