
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
लासिना- वाघापूर शेतशिवार परिसरात गॅस गोदामाजवळ १५ मार्च रोजी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर कॅहकूने वार केल्याच्या खुणा तसेच दगडाने ठेचल्याचे स्पष्ट होत होते. याशिवाय डोळ्यांत तिखट टाकण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक प्रश्न उपस्थित होते मात्र पोलिसांनी कुशलतेने २४ तासात या हत्येचा उलगडा केला.
Jalna Crime: गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून 110 सिलिंडर चोरी; साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास
पोलिसांना तपासादरम्यान मृतांची ओळख आतिष सुभाषराव देखमुख (वय 36, रा. गोविंद नगर, यवतमाळ) अशी पटली. मृतकाच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स आणि शेवटच्या संपर्काच्या आधारे तपासाची सूत्रे पुढे नेली. या तपासात अंकुश नागोराव खोडे (वय 43) आणि त्यांची पत्नी रुपाली अंकुश खोडे (वय 38, रा. दांडेकर लेआउट, यवतमाळ) यांच्यावर संशय बळावला.
जीवे मारण्याच्या धमक्या
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आले की, मृतक आतिश देशमुख याचे रुपाली खोडे हिच्याशी पूर्वी संबंध होते. मात्र नंतर संबंध तुटल्यानांतर देखील आतिश तिला वारंवार संपर्क करत होता. तो तिच्यावर पुन्हा संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता, तसेच तिच्या पाटील जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.
ओतूरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार; वर्गात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला
या सततच्या त्रासाला कंटाळून पती-पत्नीने मिळून आतिशचा काटा काढण्याचे ठरवले. १४ मार्च रोजी आतिशला वाघापूर शेतशिवारात बोलावले. तेथे त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी डोळ्यांत तिखट टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आरोपी अटकेत
या प्रकरणी मृताचे काका पंजाबराव मारोतराव देशमुख यांच्या तक्रारीवरून लाडखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.
Ans: आतिश सुभाषराव देशमुख (वय 36) असे मृतकाचे नाव आहे.
Ans: एकतर्फी संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली.