
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
तुषार गजानन सोळंके (१९) असे जखमी युवकाचे नाव आहे. तो आणि त्याचा मित्र कार्तिक कुडमेथे हे दुचाकीवरून आर्णी मार्गावर राणा प्रताप गेट येथून जात होते. त्यावेळी त्यांना मागून आलेल्या दोघांनी आवाज देऊन थांबवले. जुना वाद उकरून काढत त्या दोघांनी कार्तिक सोबत वाद घालण्यास सुरुवात केली.भीतीने कार्तिक तेथून पळून गेला, तर तुषार तेथेच उभा होता. कार्तिकचा राग त्या दोघांनी तुषारवर काढला.चाकूने थेट तुषारच्या पाठीत वार केला. चाकू त्याच्या पाठीतच अडकला, तो बाहेर न आल्याने हल्लेखोर मुलांना तेथून पळ काढला. जखमी तुषार पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात पोहोचला.
केवळ साधा गुन्हा दाखल
ही घटना वर्दळीच्या ठिकाणी झाली. त्यामुळे या हल्लयाचे घटनेचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तुषार सोळंखे याने दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर अवधूतवाडी पोलिसांनी कलाम ११८ (२)३ (५) बीएनएसनुसार मारहाणीचा गुन्हा दाखल केला. थेट चालून हल्ला जीवघेण्या प्रकारात मोडणार आहे. मात्र तरीही अवधूतवाडी पोलिसांनी त्या हल्लेखोरांवर मारहाणीचा साधा गुन्हा दाखल केला. चारचौघात चाकूने वार करून साध्या सूचनापत्रावर हल्लेखोर सुटणार असल्याने त्यांना पुढच्या वेळी यापेक्षा मोठा गुन्हा करण्याची संधीच पोलिसांनी दिल्याचे बोलले जात आहे.
डोळ्यात तिखट, चाकूने वार आणि दगडाने ठेच; संतापलेल्या पती-पत्नीने मिळून तरुणाची केली हत्या
यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीने मिळून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासात उलगडा करत पती- पत्नीला अटक केली आहे. एकतर्फी अनैतिक संबंधातून सुरु झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस ठाणे हद्दीत घडली.
Ans: यवतमाळ शहरातील राणा प्रताप गेट परिसरात.
Ans: तरुणाच्या पाठीत चाकू खुपसला गेला, पण चाकू अडकल्याने जीव वाचला.
Ans: गंभीर गुन्ह्याऐवजी साधा मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला.