Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉंग्रेसच्या नेत्यांनी ऊसतोड कामगार मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक दुष्काळ…; सांगलीतून देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील जत तालुक्यातून केली. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे कौतुक करत कॉंग्रेसवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 06, 2024 | 02:26 PM
Devendra fadnavis target rahul gandhi and congress

Devendra fadnavis target rahul gandhi and congress

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून सभांचा धडाका सुरु आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कालपासून (दि.05) प्रचाराला सुरुवात केली आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जोरदार राजकीय टीका केली. महाविकास आघाडीवर निशाणा साधला असून उद्धव ठाकरे यांना देखील धारेवर धरले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी फडणवीस यांनी जत तालुक्यातील दुष्काळावर भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, “जत तालुक्याबद्दल एक कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले होते की, जतमध्ये पाणी पोहोचलं तर माझ्या साखर कारखान्याला कामगार मिळणार नाहीत. त्यामुळे इथे पाणी पाठवू नका. वर्षांनुवर्षे या ठिकाणी पाणी देण्यात आलं नाही. जाणीवपूर्वक या ठिकाणी दुष्काळ तयार करण्यात आला. ज्यामुळे येथील माणूस मागे राहिला पाहिजे. तो विस्थापिक राहिला पाहिजे, यासाठी पाणी दिले गेले नाही. पाण्यासाठी कॉंग्रेस जे करु शकलं नाही ते भाजपने करुन दाखवलं,” असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हे देखील वाचा : उद्धवजी तुम्ही पापी…शिवरायांनी टकमक टोकावरून तुमचा कडेलोट…; तुफान राजकीय टीका

कॉंग्रेस सावत्र भाऊ

पुढे फडणवीस म्हणाले की, “यापूर्वी कधीच लिंगायत समाजाचा विचार कोणत्या सरकारने केला नव्हता, आमच्या सरकारने केला. गोपीचंद पडळकर यांनी एमआयडीसी मंजूर करुन घेतली आहे, उद्योग देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. माझ्या गोपीचंदला विधानसभेला पाठवा. उद्योगाचं पत्र देऊनच जतला परत येईल. आम्ही अनेक योजना आणल्या. लाडकी बहीण योजना आम्ही आणल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. बहिणींनो समजून घ्या, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत. पण तुमचे काही सावत्र भाऊ देखील आहेत. कॉंग्रसेचे हे तुमचे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले. नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणुक प्रमुख कोर्टामध्ये गेले. त्यांनी मागणी केली की लाडकी बहीण योजना, लेक लाडकी आणि मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा असे कॉंग्रेसने कोर्टात सांगितले,”  असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील भाषणामध्ये केला.

हे देखील वाचा : “राहुल गांधींभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका, लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देतात?” देवेंद्र फडणवीसांची टीका

लाल संविधान का दाखवतात?

पुढे फडणवीस म्हणाले की, “पुन्हा तुमचा आशिर्वाद मिळाला तर लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 नाही तर 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे एका बाजूला सामान्यांच्या पाठीशी उभे राहणार सरकार आहे. विधानसभेची निवडणूक असल्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत. पण राहुल गांधी ज्या प्रकारची मोट बांधत आहेत ती महाराष्ट्राकरता आणि देशाकरता घातक आहे. भारत जोडो नावाचं संघटन सुरु करुन त्यातून चांगलं काम करत असल्याचं सांगितलं. पण त्या भारत जोडोमधील 100 हून अधिक संघटना या देशामध्ये अराजकता पसरवणाऱ्या आहेत. समाजामध्ये द्वेश आणि दुरभावना कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना आहेत. देशाच्या संविधानावर आणि देशाच्या सर्वोच्च्य न्यायालयावर समाजाचा विश्वास कसा कमी होईल, याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये आहेत. यांचे भारत जोडो नाही तर भारत तोडो आंदोलन आहे. माझा राहुल गांधींना सवाल आहे की, संविधानाचे लालच पुस्तक का दाखवताय? लाल पुस्तकातून कोणाला इशारा देत आहात. आपल्या समाजाची वीण उद्धवस्थ करण्याचा हा प्रयत्न आहे,” असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Web Title: Devendra fadnavis targets congress for not providing water to sangli jat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Assembly election 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
2

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
3

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
4

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.