मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का! रवी राजा भाजपमध्ये जाणार (फोटो सौजन्य-X)
Ravi Raja resigns: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसचा ‘हात’सोडला. आता ते भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.ते काँग्रेसचा मुंबईतील चेहरा मानले जातात. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केला.
काँग्रेसमध्ये मेरिटनुसार तिकीट मिळत नसल्याचा आरोप करत रवी राजा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सायन विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. केवळ तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. याचदरम्यान आज (31 ऑक्टोबर) सकाळीच ते भाजपच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद भूषवलेल्या मधुकरराव पिचड, नारायण राणे यांच्यापासून एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षांतर केल्याच्या परंपरेत आता माजी नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांची भर पडली आहे.
हे सुद्धा वाचा: सोलापुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईपर्यंत हलवली सूत्र; उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज मंजूर
मुंबई महापालिकेचे पाचवेळा नगरसेवक असलेले रवी राजा यांना सायन-कोळीवाडा मतदारसंघातून काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवायची होती. पण, त्यांच्या या डावाला राज्यातील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळाला असता, मात्र हायकमांडने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. 44 वर्षीय सेवेचा सन्मान न केल्याची केली खंत त्यांनी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ते भाजप प्रवेश करत आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कॅप्टन तामिळ सेल्वन यांचा 14 हजार मतांच्या फरकाने पराभव झाल्यानंतर काँग्रेसने गणेश यादव यांना तिकीट दिले आहे. रवी राजा सायन-कोळीवाड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पक्षाचा, विशेषतः तमिळ आणि मराठी मतदारांचा पाठिंबा कमी होईल. सत्ताविरोधी लढा देत असलेल्या कॅप्टन तमिलसेल्वन यांना भाजपमध्ये प्रवेश केल्याने बळ मिळणार आहे.
भाजपची पत्रकार परिषद साडेअकरा वाजता आहे. पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वाची आहे. भाजपकडून नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून नाराजी आहे, यावर चर्चा होईल. सोबतच सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरी याबाबत देखील चर्चा होईल, असे सांगितले जात आहे.
हे सुद्धा वाचा: धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली…; अमित ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत