Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील या परिस्थितीला निवडणूक आयोग अन् सुप्रीम कोर्ट जबाबदार; संजय राऊतांचा घणाघात

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देखील सत्तास्थापन न झाल्यामुळे संजय राऊत आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 01, 2024 | 11:01 AM
Sanjay Raut accuses Supreme Court and elections of being responsible for Maharashtra political situation

Sanjay Raut accuses Supreme Court and elections of being responsible for Maharashtra political situation

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल जाहीर झाला आहे. तरी देखील सरकार स्थापनेला विलंब होत असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन शपथविधीची तारीख व वेळ जाहीर केली आहे. यानंतर आता ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी काळजीवाहू सरकार ही पद्धत देखील संविधानाच्या विरोधात असल्याची टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “काळजीवाहू सरकार अशी संकल्पना संविधानामध्ये नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 तारखेलाच संपली आहे. त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हायला पाहिजे होती. हे त्यांचे भाडोतरी कायदेपंडित काहीही कागद आणून दाखवतील. निकाल लागून 10 दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. बहुमत असून देखील दावा का केला नाही? मुख्यमंत्री कोण आणि भाजपचा विधीमंडळाचा नेता कोण? या संदर्भात निर्णय झालेला नाही. एवढा मोठा पक्ष असून निर्णय घेता येत नाही,” असा घणाघात संजय राऊत य़ांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे संजय राऊत म्हणाले की, “यांना राज्यपालांचे अधिकार दिलेले आहेत का? हे सांगत आहेत की आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ. चंद्रशेखर बावनकुळे हे काय राज्यपाल आहेत का? हा निर्णय राज्यपालांचा असतो. यांनी अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. ही अत्यंत गंभीर परिस्थिती असून घटनात्मक पेचप्रसंग आहे. याला जबाबदार माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आहेत. सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोग या सर्व घटनात्मक संस्था महाराष्ट्रातील परिस्थितीला जबाबदार आहेत,” असा घणाघात संजय राऊत यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे होणाऱ्या 5 तारखेच्या शपथविधीला तरी येणार आहेत का? त्यांना खरंच डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची गरज आहे. हे मांत्रिक अमित शाह किंवा नरेंद्र मोदी पाठवतील. यांच्या अंगामध्ये जी भुतं संचारली आहेत ती उतरवायला लागतील. हे काम आता देवेंद्र फडणवीस करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुढे त्यांनी महायुतीमध्ये खातेवाटपावर सुरु असलेल्या गोंधळावर टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे त्यांना कोणतं खातं हवं ते स्वतः ठरवू शकत नाहीत. त्यांना नरेंद्र मोदी व अमित शाह ठरवणार आहेत. यांच्यासमोर कोणती हाडं टाकायची आणि काय चघळायचं हे यांच्या हातात नाही. यांच्या हातामध्ये फार तर रुसवे फुगवे आणि नंतर शरण जाणे या पलिकडे यांच्या हातामध्ये काहीच नाही. आम्ही जो निर्णय घेतला तो आमच्या स्वाभिमानासाठी घेतला होता,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Sanjay raut accuses supreme court and elections of being responsible for maharashtra political situation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • Election Commission
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
2

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
3

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
4

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.