
Sanjay Raut, Maharashtra Politics,
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यासोबतच खोचक सवालही विचारला आहे. या व्हिडिओमध्ये नार्वेकर यांनी ‘पळ काढला’ असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे.. तुम्ही सांगताय की मी सांगू?” या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विधानसभा अध्यक्ष यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
दरम्यान, संजय राऊतांनी (Sanjay Raut) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काही ग्रामस्थ राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत. तू व्हिडीओ कर असे ते बोलताना दिसत आहेत. नार्वेकर यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला एक पुरूष त्या महिलेला तू मार याला असेही बोलताना दिसत आहे. साखरपुडा असताना तुम्ही आला होता. आता आम्ही घरात नाही ही संधी साधून घरात शिरता का तुम्ही? आतमध्ये बसायला येऊ नकोल असं तुला सांगितलं होतं. ना, असेही तो ग्रामस्थ बोलताना दिसत आहे. तर त्यावर तो कार्यकर्ता मी काहीच केलं नाही, तुमच्याशी चांगलंच बोललो, असं म्हणताना ऐकू येत आहे.
ब्रेकिंग: विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?
राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!
तुम्ही सांगताय की मी सांगू?
@Dev_Fadnavis
@rahulnarwekar
@PMOIndia pic.twitter.com/r5YqC9j2Xi — Sanjay Raut (@rautsanjay61) February 14, 2026
तो ग्रामस्थ आमची एवढी जागा गेली तर काय नाही, असं म्हटल्यावर राहुल नार्वेकर म्हणातात, “ऐका भांडणं करू नका. सरकारी काम करत असतील तर त्यांना करू देत. असं सांगताना दिसत आहेत. पण ग्रामस्थ ऐकत नाहीत म्हटल्यावर नार्वेकरांनीही तिथून काढता पाय घेतला आणि निघून गेल्याचे व्हिडीओत दिसते.
Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer
हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात हा प्रकार घडला आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राहुल नार्वेकर हे शेतजमिनीची मोजणी करण्याचे काम करत होते. यावेळी त्यांनी ‘दादागिरी’ केल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ यांनी म्हटले आहे की, ‘स्थानिक शेतकऱ्यांनी नार्वेकरांच्या या कृत्याला तीव्र विरोध दर्शवला.शेतकऱ्यांचा रोष इतका होता की, विधानसभा अध्यक्षांना तिथून अक्षरशः पळ काढावा लागला. दरम्यान, या प्रकरणावर आता सत्ताधारी पक्षाकडून किंवा स्वतः विधानसभा अध्यक्षांकडून काय स्पष्टीकरण येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.