
फोटो सौजन्य - Social Media
आंचलच्या मते, संबंधित तरुण आणि तरुणीचे लग्न कुटुंबीयांच्या संमतीने ठरले होते. मात्र, तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत तिने आपल्या पालकांशी किंवा होणाऱ्या जोडीदाराशी संवाद साधण्याऐवजी चुकीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप आंचलने केला. “हा विषय स्त्री किंवा पुरुष यांच्यापुरता मर्यादित नाही. हा माणुसकी, नैतिकता आणि नातेसंबंधांमधील प्रामाणिकपणाचा प्रश्न आहे. मतभेद असतील तर त्यावर संवादाने तोडगा काढता येतो, मग हिंसेचा पर्याय का निवडला जातो?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.
तिने पुढे कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराचे समर्थन करता येणार नसल्याचे सांगत, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अग्रवालचा सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात मानला गेला होता. मात्र, नंतर मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपासाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. या दोघांनी मिळून कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, प्रकरणाचा सखोल तपास अद्याप सुरू आहे.