
फोटो सौजन्य - Social Media
काय आहे ‘आता थांबवायचं कसं?’
‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकात मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने तसेच दिग्गज अभिनेते डॉ.गिरीश ओक झळकणार आहेत. या नाटकाचा विषय आधुनिक कुटुंबाच्या अवतीभोवती फिरतो. एकंदरीत, आताच्या कुटुंब पद्धतीत सोशल मीडियाचा वापर सर्रास होतो. घरातली सगळी मंडळी सोशल मीडिया तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आहारी गेली आहे, याचा परिणाम कुटुंबावर कसा होतो? या सगळ्या गोष्टी या नाटकात पाहायला मिळणार आहे.
काय म्हणाले नाटकाचे मुख्य नट ‘डॉ.गिरीश ओक’?
Dr. Girish Oak आणि Sukanya Mone अवघ्या तीन दशकांनंतर एकत्र रंगभूमीवर झळकणार असल्याबद्दल व्यक्त होताना गिरीश ओक म्हणतात की, “सुकण्याबरोबर नाटक करताना, अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तिचं आणि संजयचं लग्नही आमच्या डोळ्यादेखत झालं. आज आम्ही दोघं नव्या केमिस्ट्रीसह तब्ब्ल 30 वर्षांनी रंगमंचावर एकत्र आलो आहोत.”
‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाबद्दल सांगताना ते म्हणाले की “या नाटकाची कथा मी पनवेलमध्ये एकदा पहिली होती. एकंदरीत, ती एकांकिकाच होती. मी एका मुलीचा बाप आहे आणि या नाटकाची कथा मला हादरून सोडणारी होती. ही कथा पाहून मला वाटलं की हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणे फार महत्वाचे आहे आणि अर्थातच त्यासाठी मी फार प्रयत्नही केले.” पुढे गिरीश ओक म्हणतात की, “या नाटकात मी वडिलांची भूमिका साकारली आहे. या नाटकातली माझी भूमिका आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात वडील म्हणून माझी भूमिका, यामुळे मी भावनांची तीव्रता समजू शकतो. एकंदरीत, माझा विश्वास आहे की ‘हे नाटक पालक आणि मुलांमधला संवाद अधिक मजबूत करेल.”
काय म्हणाल्या सुकन्या मोने?
“२०१४ मध्ये ‘सेल्फी’ हे नाटक केल्यानंतर मी रंगभूमीपासून दूर होते. मात्र ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाची संहिता वाचताच ती मनाला भिडली आणि पुन्हा नाटकाकडे वळण्याची इच्छा झाली. ‘कुसुम मनोहर लेले’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर Dr. Girish Oak यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्यातील समजूत आणि ट्युनिंग इतकी सहज आहे की अनेकदा संवादांशिवायही आम्ही एकमेकांना समजून घेतो.”