
‘बोल बोल राणी’ हा सिनेमा Rashomon Effect या संकल्पनेतून दाखवण्यात आला आहे. एकंदरीत, एका खुनाची कथा तीन वेगवेगळ्या साक्षीदारांच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिनेमा समजणे आणखीन सोपे होऊन जाते, असे आपल्याला वाटते. पण एखाद्या बाजूला तीन भिन्न बाजूंनी दाखवण्यात आले तर बाजू समजणे गुंतागुंतीचे होऊन जाते. सिनेमा पाहताना सिनेमाकडे लक्ष असणे अतिशय आवश्यक आहे. सिनेमात खून झाला आहे. परंतु ‘तो खुन कुणी केला?’ यापेक्षा ‘लोक वेगवेगळ्या प्रकारे सत्य कसे पाहतात?’ यावर हा सिनेमा लक्ष खिळवून ठेवतो.
‘बोल बोल राणी’ या सिनेमात ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी दाखवण्यात आल्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षक जास्त प्रमाणात आकर्षित होत आहेत. सिनेमाची नाट्यपूर्ण मांडणी या सिनेमाचे बलस्थान आहे. सिनेमा प्रदर्शित होताच विविध वाहिन्यांवरील सिनेमा विश्लेषकांनी सईच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे. सई ताम्हणकर या सिनेमाची केंद्रबिंदू आहे. तसेच चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे आणि सुबोध भावे यांच्या अभिनयाचेही कौतुक करण्यात आले आहे.
Jr NTR: बालकलाकार ते ग्लोबल स्टार! सुपरस्टार एनटीआरबद्दलच्या ‘या’ ७ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
काही विश्लेषकांच्या मते, सिनेमा गुंतागुंतीचा आहे. कधीकधी ती अधिक क्लिष्ट वाटते. सिनेमा जरी दोन तास प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवत असला तरी शेवटी कथेत इतका भावनिक वजन दिसून येत नाही. कदाचित, सर्व प्रश्नांची उत्तरे देणे या सिनेमाचा उद्देश नसेल. एकंदरीत, “बोल बोल राणी” हा सिनेमा धाडसी, वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रयोग आहे.