Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor : ४० पाकिस्तानी सैनिक, १०० दशहतवादी ठार; ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय लष्कराने दिली A टू Z माहिती

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर रविवारी सायंकाळी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरवर एकत्र पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, डीजीएमओ राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सविस्तर माहिती दिली.

  • By संदीप गावडे
Updated On: May 11, 2025 | 07:55 PM
ऑपरेशन सिंदूरचा नक्की उद्देश काय?, पत्रकार परिषदेत घेत भारतीय लष्कराने दिली A टू Z माहिती

ऑपरेशन सिंदूरचा नक्की उद्देश काय?, पत्रकार परिषदेत घेत भारतीय लष्कराने दिली A टू Z माहिती

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर रविवारी सायंकाळी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरवर एकत्र पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, डीजीएमओ राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सविस्तर माहिती दिली. दहशतवाद संपवणे ऑपरेशन सिंदूरचं मुख्य ध्येय होतं. भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानस्थित ९ दशहतवादी तळ उदध्वस्त झाले असून यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. बहावलपूर आणि मुदिरके मुख्य लक्ष्य होते. सैन्याने फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ले केले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Jammu-Kashmir News: दक्षिण काश्मीरमध्ये २० ठिकाणी छापेमारी; स्लीपर सेलचा पर्दाफाश

पाकिस्तानने शस्त्र म्हणून नागरी विमानांचा वापर केला. कोणत्याही भारतीय हवाई तळाचे नुकसान झाले नाही. पाकिस्तानने श्रीनगरपासून कच्छपर्यंत ड्रोन हल्ले केले. जम्मू, उधमपूर आणि पठाणकोट हवाई तळांवर हल्ला केला. पाकिस्तानने ८ आणि ९ मे रोजी ड्रोन हल्ले केले. मात्र आम्ही तयार होतो, त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. आम्ही लाहोरमधील रडार प्रणाली नष्ट केली. यात ३५-४० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं त्यांनी सांगितलं.

हलाई दलाने ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं.

ऑपरेशन सिंदूर नक्की होते तरी काय…? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितली भारतीय सैन्याची यशोगाथा

पाकिस्तानच्या गोळीबारात कोणतेही नुकसान नाही

७ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतात कोणतेही नुकसान झाले नाही, कारण भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सक्रिय आणि सतर्क होती. आमच्या हवाई संरक्षण तयारीमुळे पाकिस्तानी हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. आम्ही प्रत्येक संभाव्य धोक्याला वेळीच निष्प्रभ केले. ८ आणि ९ मे रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून भारतीय शहरांकडे ड्रोन, यूएव्ही (मानव रहित हवाई वाहने) आणि यूसीएव्ही (मानव रहित लढाऊ हवाई वाहने) सोडण्यात आली. ७ मे रोजी यूएव्ही पाठवण्यात आले होते, परंतु ८ मे रोजी त्यांची संख्या कमी झाली. परंतु त्यांचा उद्देश पाळत ठेवणे आणि नागरिकांना घाबरवणे हा होता, अशी माहिती भारतीय हवाई दलाचे डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिली.

तर जोरदार प्रत्युत्तर देऊ: डीजीएमओ

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, काल दुपारी ३:३५ वाजता माझा पाकिस्तानच्या डीजीएमओशी संपर्क झाला, ज्यामुळे पाकिस्तानच्या डीजीएमओने सुचविल्याप्रमाणे १० मे २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी घोषित करण्यात आली. हा करार मजबूत आणि दीर्घकालीन कसा बनवायचा यावर चर्चा करण्यासाठी आम्ही १२ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, निराशाजनकपणे, पाकिस्तानी सैन्याने अवघ्या काही तासांत या करारांचे उल्लंघन केले आणि सीमापार गोळीबार आणि ड्रोन हल्ले करून आमच्या कराराचे पालन करणार नाही असा निर्णय घेतला. या उल्लंघनांना कडक प्रत्युत्तर दिले आणि आज सकाळी आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओला एक हॉटलाइन संदेश पाठवला आहे. जर पाकिस्तानने या उल्लंघनांची पुनरावृत्ती केली तर कडक प्रत्युत्तर देण्यात येईल, असं सुनावण्यात आलं आहे.

Web Title: 100 terrorists killed 9 terrorist camps distoy indian army operation sindoor a to z information know it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 07:26 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • indian army
  • Operation Sindoor

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.