IIT मुंबई, एरोस्पेस इंजिनिअर ते साधू; प्रचंड हुशार तहीरी का आणि कसे बनले अभय सिंग मसानी गोरख बाबा? वाचा संपूर्ण कहाणी
प्रयागराजमध्ये सोमवारपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संत आणि साधू प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मसानी गोरख बाबा उर्फ आयआयटी बाबा, ज्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते की, आयआयटीमधून अभियांत्रिकी केल्यानंतर ते साधू बनले आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल स्ट्रीममध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण देखील घेतलं. हरियाणाचे रहिवासी असलेल्या आयआयटी साधूचं खरं नाव आहे अभय सिंग. अभय सिंग यांची अभियंता ते संन्यासी बनण्यामागील कहाणीही खूप रंजक आहे. त्यांना फोटोग्राफी करायची होती. फोटोग्राफीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी पदवी आवश्यक होती. अशा परिस्थितीत मी एक वर्ष कोचिंगही शिकवलं
“…तर मोहन भागवतांना अटक करण्यात आली असती”; राहुल गांधी नेमकं म्हणाले तरी काय?
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपिते उलगडली. जेव्हा बाबांना विचारण्यात आले की अभियांत्रिकी आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही या टप्प्यावर कसे पोहोचलात? यावर बाबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की ही सर्वोत्तम अवस्था आहे. ज्ञानाचा पाठलाग करत राहा, पुढे जात राहा, तुम्ही किती दूर जाल? शेवटी आपल्याला इथं यावंच लागेल. पण त्यावेळी मला काय करावं हे समजत नव्हतं?
यआयटी मुंबईमध्ये ४ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्राचे प्रशिक्षणही घेतले. माझ्या आवडीमुळे मी कला क्षेत्रात गेलो आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. मी डिझायनिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली. मात्र तरीही मी कशावरही लक्ष केंद्रित करू शकलो नाही. माझ्या आतली चिंता वाढत गेली.
बाबा म्हणाले की आयुष्याच्या सुरुवातीला मला अभियांत्रिकी करायचे होते पण त्यानंतरही मला जीवनाचा अर्थ आणि मी काय करावे हे समजू शकले नाहीत. यानंतर मला वाटले की मी फोटोग्राफी करावी. मी ट्रॅव्हल फोटोग्राफी सुरू केली आणि मला वाटले की मी त्यात माझे स्वप्नातील जीवन जगेन. आपण प्रवास करू, सगळीकडे जाऊ, खूप मजा करू आणि पैसेही कमवू. हे एक अद्भुत जग असेल.
बाबा म्हणाले की मी अभियांत्रिकीच्या माध्यमातूनही पैसे कमवू शकलो असतो, पण मी माझा छंद पूर्ण केला. पण मला इथेही जीवनाचा अर्थ समजला नाही. मसानी बाबा सध्या प्रयागराजमधील त्रिवेणी संगम येथे २०२५ च्या महाकुंभाचा आनंद घेत असले तरी, त्यांनी त्यापूर्वी अनेक धार्मिक शहरांना भेटी दिल्या आहेत. तो गेल्या चार महिन्यांपासून काशीमध्ये राहिला. याशिवाय तो ऋषिकेशमध्येही राहिले आहेत. ते चारही धामांमध्ये राहतात. त्याचे ठिकाण बदलत राहते.