नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी वरुण गांधी (Varun Gandhi) यांना उत्तर प्रदेशातील पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलेलं नाही. याच दरम्यान सुलतानपूरमधील भाजप उमेदवार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी मी भाजपामध्ये खूप असल्याचं म्हटलं आहे.
मनेका गांधी म्हणाल्या, मी भाजपमध्ये आहे, याचा मला खूप आनंद आहे. मला तिकीट दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांचे आभार मानते. तिकीट जाहीर होण्यास उशीर झाला. त्यामुळे मी सुलतानपूर की पीलीभीतमधून निवडणूक लढवणार असा पेच निर्माण झाला होता. पक्षाने आता घेतलेल्या निर्णयाबद्दल मी आभारी आहे. मी सुलतानपूरला परत आले याचा मला खूप आनंद आहे. कारण या ठिकाणचा इतिहास असा आहे की, सुलतानपूरचा एकही खासदार पुन्हा सत्तेत आलेला नाही.
मनेका गांधी यांच्या सुलतानपूर दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, त्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील 101 गावांना भेट देणार आहेत. कटका गुप्तारगंज, तातियानगर, टेढुई, गोलाघाट, शाहगंज चौक, दरियापूर तिराहा आणि पयागीपूर चौक या ठिकाणी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे.
त्यांना काय करायचं आहे हे त्यांनाच विचारा
वरुण गांधींचं पीलीभीतमधून तिकीट कापल्याबाबत विचारलं असता मनेका गांधी म्हणाल्या की, “त्यांना काय करायचं आहे हे त्यांनाच विचारा. निवडणुकीनंतर याचा विचार करू. वेळ आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांना तिकीट दिलेलं नाही. त्यांच्या जागी उतर प्रदेशचे मंत्री जितन प्रसाद यांना तिकीट देण्यात आलं आहे”.