Air India reaction on Ahmedabad plane crash AAIB primary report News In Marathi
Air India Plane Crash Report : नवी दिल्ली : मागील महिन्यांमध्ये अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात झाला होता. नुकतेच उड्डाण घेतलेल्या एअर इंडियांच्या विमान कोसळले होते. यामध्ये जवळपास 270 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विमानाच्या भयानक अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये विमानाने उड्डाण घेताच त्याचे इंजिन अचानक बंद झाले असा रिपोर्ट आला आहे. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. याचा अर्थ असा की दोन्ही इंजिन टेकऑफच्या काही सेकंदातच बंद पडले, अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली. यावर आता एअर इंडियाने प्रतिक्रिया दिली आहे.
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या अहवालात नोंदवलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले की, टेकऑफच्या वेळी एका पायलटने एका सहकाऱ्याला विचारले, “तुम्ही इंधन का कमी केले?” उत्तरात, दुसऱ्या पायलटने म्हटले, “मी हे केले नाही. यावरून हे स्पष्ट होते की पायलटने इंधन बंद केले नव्हते. यामुळे दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ एकाच वेळी कसे झाले असा प्रश्न उपस्थित होतो. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
08:08:42 UTC ला विमानाने १८० नॉट्सचा कमाल वेग गाठला. फक्त एका सेकंदात, दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ स्थितीत हलवले. वैमानिकांनी ताबडतोब दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला आणि रिलाईट प्रक्रिया देखील सुरू झाली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. परिणामी विमान 08:09:11 UTC वाजता क्रॅश झाले, असे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.
Air India stands in solidarity with the families and those affected by the AI171 accident. We continue to mourn the loss and are fully committed to providing support during this difficult time.
We acknowledge receipt of the preliminary report released by the Aircraft Accident…
— Air India (@airindia) July 11, 2025
एअर इंडियाच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन या अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे. या अहवालावर प्रतिक्रिया देताना तपास अजून सुरु असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. पुढे त्यांनी लिहिले आहे की, “एअर इंडिया AI171 अपघातामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसोबत आणि त्यांच्यासोबत एकजुटीने उभी आहे. आम्ही या नुकसानाबद्दल शोक व्यक्त करत आहोत आणि या कठीण काळात मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“आज, १२ जुलै २०२५ रोजी विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या प्राथमिक अहवालाची आम्ही दखल घेतो. एअर इंडिया नियामकांसह भागधारकांसोबत जवळून काम करत आहे. आम्ही AAIB आणि इतर अधिकाऱ्यांशी त्यांचा तपास पुढे जात असताना पूर्ण सहकार्य करत आहोत. तपासाचे सक्रिय स्वरूप पाहता, आम्ही विशिष्ट तपशीलांवर भाष्य करण्यास आणि अशा सर्व चौकशी AAIB कडे पाठवण्यास असमर्थ आहोत, अशी भूमिका एअर इंडियाने घेतली आहे.