Indoli Accident Rasta Roko: इंदोलीत १९ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याने ८ तास रस्ता रोको करण्यात आला. जयवंत शुगर कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
चाकण–तळेगाव महामार्गावर म्हाळुंगे गावच्या हद्दीत सकाळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.
पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी पुलावरून जात असताना पुलाला कठडा नसल्याने थेट बाजूच्या ओढ्यात खोलवर कोसळली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले.
लोकन्यायालयाने प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल विचार करत, दोन्ही बाजूंच्या संमतीने नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली. त्यानुसार संबंधित विमा कंपनी व जबाबदार पक्षाकडून पीडित अर्जदारास एक कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली.
भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने सायबर चौकात सिग्नलला थांबलेल्या गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही कार आल्याने एकापाठोपाठ एक अशा सहा वाहनांना जोरांची धडक दिली.
सकाळी नऊच्या सुमारास बोरगाव येथे पिकअप धानलामार्गे वळण घेत असताना मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. त्यामुळे पिकअप गाडी महामार्गाच्या बाजूला जाऊन लोखंडी कठड्याला धडकली.
पुण्याहून खेडच्या दिशेने प्रवास करणारी खासगी ट्रॅव्हलर बस भोगाव गावाजवळील पुलाजवळ बॅरिकेडला धडक देत थेट 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 22 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी…
मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातामध्ये रेल्वे पोलिसांनी दोन अभियंत्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
Gautami Patil Car Accident : पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले.
वाशी सेक्टर 9 मध्ये एका स्कूल व्हॅन चालकाने एका उभ्या गाडीला धडक दिली आहे. या धडकेत वाहन चालक संभाजी गणपत पाटील, यांसह दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी दोन्हीही विद्यार्थ्यांना…
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे खडी वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने दहावीच्या विद्यार्थिनीला उडवले. मात्र या अपघातात ती विद्यार्थिनी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या एका पायाला मात्र मोठी दुखापत झाली…
वारंवार होणाऱ्या अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं यासाठी चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी…
काशिमिरा परिसरात काल एका ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आरएमसी प्लांटच्या डंपरखाली चिरडून मुलाचा जीव गेल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेनंतर स्थानिकांनी आंदोलन केलं आहे.
काशिमिरा परिसरात आज दुपारच्या सुमारास एका रेडीमिक्सच्या डंपरने एका अकरा वर्षांच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. यावर संतप्त मनसैनिकांनी शहरात रास्ता रोको आंदोलन केलं आहे.