Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे JEE च्या तब्बल 30 विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली; परीक्षा हॉलमध्ये एंट्रीच नाही

विद्यार्थी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. यामुळेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याण यांच्या ताफ्यासाठी लादलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचण्यास उशीर झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2025 | 02:37 PM
उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे JEE च्या तब्बल 30 विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली; परीक्षा हॉलमध्ये एंट्रीच नाही

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे JEE च्या तब्बल 30 विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली; परीक्षा हॉलमध्ये एंट्रीच नाही

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा आला की सर्वसामान्यांच्या गाड्या थांबवण्याचे अनेक प्रकार आपण अनुभवले असतील. मात्र, अशाचप्रकारे उपमुख्यमंत्र्यांचा ताफा आल्याने JEE च्या विद्यार्थ्यांना अपेक्षित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित व्हावे लागले.

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वाहनांचा ताफा पेंडुर्थी येथून जात होता. यादरम्यान वाहतुकीवर बंधने आल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. पेंडुर्थी येथील चिन्नामुसीदीवाडा येथील आयओएन डिजिटल झोन इमारतीत सकाळी साडेआठ वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, विद्यार्थी वेळेत न पोहोचल्याने त्यांना परीक्षेला बसू देण्यात आलेले नाही. विशाखापट्टणममध्ये JEE या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेला बसण्यापासून 25 हून अधिक विद्यार्थांना रोखण्यात आले. हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्याने त्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याची माहिती समोर येत आहे.

अनेक विद्यार्थी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. यामुळेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यासाठी लादलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचण्यास उशिर झाला. पवन कल्याण यांचा ताफा आराकू जात असल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. याचा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशिर झाल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही.

दोन मिनिटांमुळे नाही मिळाला प्रवेश

JEE ची एक विद्यार्थिनी 8.32 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचली होती. तरी तिला दोन मिनिटे उशिरा आल्याने प्रवेश देण्यात आला नाही. दरम्यान, 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अशाप्रकारे प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ नये या हेतूने या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी आता केली जात आहे.

Web Title: As many as 30 jee students missed their exams due to dy cm convoy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Andhrapradesh
  • pawan kalyan
  • political news

संबंधित बातम्या

आमदारांच्या डॉक्टर मुलीने वडिलांना जीवनदान दिले! DCM शिंदे म्हणाले, “अशी मुलगी केवळ नशिबानेच मिळते…”
1

आमदारांच्या डॉक्टर मुलीने वडिलांना जीवनदान दिले! DCM शिंदे म्हणाले, “अशी मुलगी केवळ नशिबानेच मिळते…”

Eknath Shinde Farming : दरेगावातल्या शेतीत रमले एकनाथ शिंदे, विरोधकांना ही दिला शेती करण्याचा सल्ला
2

Eknath Shinde Farming : दरेगावातल्या शेतीत रमले एकनाथ शिंदे, विरोधकांना ही दिला शेती करण्याचा सल्ला

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान
3

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान

Satara News : बहुमत असूनही प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपवर थेट आरोप
4

Satara News : बहुमत असूनही प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपवर थेट आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.