Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचं भारतात विलिनीकरण होणार का? चेतन भगत नक्की म्हणाले तरी काय?

सध्याच्या परिस्थितीत भारताने नातेसंबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या विलिनीकरणासाठी आपण तयार असल्याचं सांगायला हवं. एकिकरण होणं अशक्य आहे. जरी झालं तरी त्याला खूप वेळ लागेल. मात्र यातून भारत पाकिस्तानमध्ये एक प्रो इंडिया पार्टी तयार करु शकतो.

  • By साधना
Updated On: Feb 28, 2023 | 01:41 PM
chetan bhagat

chetan bhagat

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान (Pakistan) देशाची निर्मिती 1947 मध्ये करण्यात आली. मात्र आजही बहुसंख्य भारतीय ही गोष्ट स्वीकारू शकलेले नाहीत. पाकिस्तानमध्ये सध्या आर्थिक स्थिती गंभीर आहे. तिथला महागाई दर 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. एका वर्षात पाकिस्तानचा रुपया 33 टक्क्यांनी घसरला आहे. पेट्रोल पंपावर इंधन नाही. वीजेची समस्या सुरु झाली आहे. अन्नधान्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर लेखक चेतन भगत (Chetan Bhagat Article) यांनी संडे टाईम्समध्ये रविवारी एक लेख लिहिला. या लेखाचं शीर्षक होतं ‘इज इट टाइम फॉर पाकिस्तान टू रिटर्न टू द मदरलँड ? (पाकिस्तानने मातृभूमीकडे परत येण्याची वेळ आली आहे का?

चेतन भगत यांनी लिहिलेल्या या लेखाची सध्या चर्चा सुरु आहे. त्यांनी लेखात लिहिलं की, एकिकडे पाकिस्तान उध्वस्त झाला आहे. दुसरीकडे भारत (India) जगासाठी ग्रोथ इंजिन असल्याचं सिद्ध होत आहे. अशा वेळी बुलेट ट्रेनची तुलना खराब ऑटोसोबत करता येणार नाही. पण भारताने या परिस्थितीचा फायदा घ्यायला हवा. ही एकत्र यायची योग्य वेळ आहे. हे लोकांना अव्यावहारिक वाटू शकतं. लोक माझ्यावर हसतील. पण एकत्र येणं हा चांगला विचार आहे. पाकिस्तान ज्याप्रमाणे काश्मीरच्या बाबतीत एक भूमिका घेऊन चालतोय त्याप्रमाणेच भारतानेही पाकिस्तानचा भूभाग परत एकत्र करुन घ्यायला हवा. पाकिस्तानचा भूभाग मुलत: भारताचा भाग नव्हता का ? फक्त काही राजकीय नेत्यांच्या घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे सत्त बदलू शकत नाही.

चेतन भगत पुढे लिहितात की, पाकिस्तानच्या निर्मितीमागे काय कारण होतं याचा विचार करा. मुस्लिम लोकांसाठी सुरक्षित जागा ? ती खरंच सुरक्षित जागा आहे का ? या देशातला कोणताही पंतप्रधान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही. हा देश दहशतवादाची जननी बनला आहे. सैन्याच्या हुकुमशाहीने लोकशाहीवर घाला घातला आहे. वारंवार भारतासोबत लढून त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला बुडवलं. ही जगातली सगळ्यात असुरक्षित जागा आहे.

एकीकृत भारत
चेतन भगत सांगतो की, भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. ते सपशेल चुकीचं ठरलं आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात मुस्लिम लोकसंख्या अनेक पटींनी वाढली आहे. ज्या समस्या आहेत त्याच्यामागे राजकारण आहे. पण खरंतर भारताच्या विकासगाथेमध्ये इतर भारतीयांप्रमाणे मुस्लिमांचाही वाटा आहे. यावेळी पाकिस्तानाच्या स्थापनेच्या सिद्धांतापेक्षा एकीकृत भारताविषयी बोलणं पाकिस्तानच्याही हिताचं आहे. पाकिस्तान आपल्या निर्मितीपासून आयडेंटीटी क्रायसिसमध्ये अडकलाय. वारंवार अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते भारतासोबत तणाव वाढवतात.

भविष्य काय ?
सध्याच्या परिस्थितीत भारताने नातेसंबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या विलिनीकरणासाठी आपण तयार असल्याचं सांगायला हवं. एकिकरण होणं अशक्य आहे. जरी झालं तरी त्याला खूप वेळ लागेल. मात्र यातून भारत पाकिस्तानमध्ये एक प्रो इंडिया पार्टी तयार करु शकतो.

Web Title: Chetan bhagat article in sunday times about india and pakistan relation nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2023 | 01:36 PM

Topics:  

  • india
  • india and pakistan
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
3

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
4

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.