
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; तब्बल 'इतक्या' रुपयांनी वाढले दर...
नवी दिल्ली : नवीन मार्च महिन्यापासून भारतात अनेक महत्त्वाचे नियम बदलत आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होण्याची शक्यता आहे. सुरक्षितता वाढविणे आणि सेवा सुधारणेच्या उद्देशाने हे सर्व बदल अंमलात आणले जात आहेत. तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. सध्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती २८ ते ३१ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला गेला नाही.
गेल्या काही महिन्यांत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार झालेत. तर घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत स्थिर आहे. गेल्या महिन्यात, कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत अंदाजे ४९ रुपयांची वाढ केली होती. १ मार्च २०२६ पासून, रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टममध्ये मोठी सुधारणा होऊ शकते. सध्या प्रमुख महानगरांमध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती २८ ते ३१ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसू शकतो. मात्र, १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती कायम राहिल्या आहेत.
हेदेखील वाचा : Todays Gold-Silver Price : सोन्याने पुन्हा केला नवा रेकॉर्ड? आजचे सोन्या – चांदीचे दर पाहून सर्वचजण चक्रावले
दरम्यान, भारतीय रेल्वेचे जुने यूटीएस अॅप बंद केले जाऊ शकते आणि नवीन रेल्वे ऑनलाइन अॅपद्वारे बदलले जाऊ शकते. या नवीन अॅपद्वारे, प्रवासी सामान्य तिकिटे, प्लॅटफॉर्म प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल करण्यासाठी हा बदल केला जात आहे.
नवीन सिम बाइंडिंग नियम
डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार १ मार्चपासून नवीन सिम बाइंडिंग नियम लागू करू शकते. या नियमानुसार, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि सिग्नलसारखे मेसेजिंग अॅप्स थेट तुमच्या मोबाइल सिमशी जोडले जातील. तुमच्या फोनमधून सिम काढून टाकला. तर हे अॅप्स काम करणे थांबवतील. सिमशिवाय हे अॅप्स वापरणे देखील वाय-फायद्वारे शक्य होणार नाही. डिजिटल पेमेंट सिस्टम अधिक सुरक्षित करण्यासाठी १ मार्चपासून नवीन सुरक्षा नियम लागू होऊ शकतात. मोठ्या रकमेचे ऑनलाइन हस्तांतरण आता केवळ यूपीआय पिनवर आधारित राहणार नाही.