
Thalapathy Vijay, TVK, DMK, MK Stalin, Tamil Nadu Govt,
टीव्हीके नेते कामराज यांनी माहिती देताना सांगितले की, टीव्हीके पूर्ण बहुमत मिळवणार आहे. डाव्या आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर विजय यांनी शुक्रवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांना ११९ आमदारांच्या समर्थनाची यादी सोपवली. राज्यात बहुमतासाठी ११८ आमदारांचा आकडा आवश्यक आहे. दुसरीकडे, काँग्रेसशी युती तोडल्यानंतर डीएमके नेत्यानेही बाहेरून पाठिंबा जाहीर केला असून सहा महिने सरकारला त्रास देणार नसल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स २०१९ च्या महाराष्ट्र पॅटर्ननुसार संपताना दिसत आहे, जिथे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा देत महाविकास आघाडी स्थापन केली होती.
Tamilnadu Political Crisis: तमिळनाडूत सत्तासंघर्ष पेटला
सरकार स्थापनेच्या हालचालीदरम्यान डीएमके विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ‘ठराव २ कडे नव्या रणनीती म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती पाहता पक्षप्रमुख एम. के. स्टालिन यांना निर्णयाचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. स्टालिन यांनी स्पष्ट केले की, तामिळनाडू आणखी एका निवडणुकीसाठी तयार नाही, त्यामुळे स्थिर सरकार बनणे आवश्यक आहे. त्यानुसार डीएमके पुढील सहा महिने विजय सरकारला त्रास देणार नाही. विश्लेषकांच्या मते, डीएमकेने आता ‘किंगमेकर’ची भूमिका घेण्याचे ठरवले असून स्टालिन यांच्या बाहेरून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विजय आता विश्वासदर्शक ठराव सहज जिंकू शकतात.
योजनांचे संरक्षण : सरकारमध्ये सामील न होताही डीएमके
आपल्या ‘द्रविड मॉडेल’ योजना (उदा. मोफत न्याहारी, महिलांना मासिक भत्ता) सुरक्षित ठेवू शकेल, बाहेरून पाठिंबा देऊन नवीन सरकार या योजना बंद करणार नाही याची खात्री ते करू शकतात..
विरोधी पक्षात बसूनही डीएमके सरकारवर दबाव पर्याय त्याच्याकडे नेहमी खुला असेल.
भाजपचे मनसुबे उधळले डीएमकेच्या प्रस्तावात जातीय
शक्तीना थारा न देण्याचे म्हटले आहे, जो थेट भाजपला दिलेला संकेत मानला जातो. स्टालिन यांना भाजपची बॅकडोअर एन्ट्री’ नको आहे, म्हणूनच डीएमकेने पाठिंबा देऊन भाजपला सत्ता समीकरणातून पूर्णपणे बाहेर केले आहे,
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांना पत्र लिहून विनंती केली होती की, तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या नेतृत्वाखाली ‘धर्मनिरपेक्ष सरकार’ स्थापन करण्यासाठी डाव्या पक्षांनी सहकार्य करावे. यानंतर खर्गे यांनी राजा यांच्याशी फोनवरही चर्चा केली, ज्यानंतर राज्याच्या सत्तेचा मार्ग सुकर झाला.